शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:37 IST

पोलिसांनी संशयाच्या आधारे मुस्कानला ताब्यात घेतले, खाकीचा धाक दाखवून तिला विचारले तेव्हा मुस्कानने सत्य बाहेर सांगितले.

नवी दिल्ली - अरहान आणि इनाया...अरहान ५ वर्षाचा तर त्याची बहीण इनायाचे वय १ वर्ष, दोघेही चिमुकले एकमेकांचा हात पकडून घराबाहेर खेळायचे. या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून कुणीही त्यांचे दु:ख सहज विसरून जाईल. परंतु या दोन कोवळ्या जीवांना काय माहिती होते, ज्याने त्यांना जन्म दिला ती आईच त्यांच्या मृत्यूचे कारण बनेल. आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या या दोन जीवांना संपवण्याचं पाप आईनेच केले आहे. 

१९ जून २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास पश्चिमी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये रुडकली तालाब अली या गावात एका घराबाहेर अजब गोंधळ दिसून आला. हे घर होते वसीम आणि त्याची पत्नी मुस्कान हिचे. बाहेर लोकांची गर्दी होती. घराच्या आतमध्ये खाटीवर २ मुलांचा मृतदेह होता. अरहान आणि इनाया हे जग सोडून गेले होते. आई धाय मोकलून रडत होती. सकाळी नाश्ता करून मुले झोपी गेली की परत उठलीच नाहीत. मुलांचे वडील कामासाठी चंदीगडला गेले होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मुलांच्या मृत्यूचा तपास सुरू केला.

आई मुस्कानची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली की, सकाळी मुलांना चहा बिस्किट आणि फरसाण खायला दिले. नाश्ता केल्यानंतर दोन्ही मुले झोपी गेले. काही वेळाने मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते उठलेच नाहीत. त्यांचा श्वास बंद झाला होता. या दोन्ही मुलांच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत. प्राथमिक तपासात एखादा विषारी पदार्थ खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांना वाटले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्याची तयारी केली परंतु आई मुस्काने त्यास नकार दिला. जेव्हा मुस्कानला विचारले तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. मग तिथेच पोलिसांच्या मनात शंका उपस्थित झाली. 

पोलिसांनी संशयाच्या आधारे मुस्कानला ताब्यात घेतले, खाकीचा धाक दाखवून तिला विचारले तेव्हा मुस्कानने सत्य बाहेर सांगितले. मुस्कानने सांगितलेला प्रकार ऐकून पोलीस अधिकारी हैराण झाले. या दोन मुलांचा जीव इतर कुणी नाही तर आई मुस्काननेच रसगुल्लामध्ये विष टाकून मुलांना खायला दिले आणि मारून टाकले होते. मुस्कानचे तिच्या आत्याच्या मुलासोबत अफेअर सुरू होते. जुनैद मुजफ्फरनगरच्या फिरोजाबाद परिसरात राहणारा आहे. काही वर्षापूर्वी मुस्कानचे लग्न वसीमसोबत झाले होते. त्या दोघांना अरहान आणि इनाया नावाची मुले होती. वसीम वेल्डिंगचे काम करत होता, त्यामुळे कामासाठी त्याला बऱ्याचदा बाहेर जायला लागायचे. जवळपास ३ वर्षाआधी मुस्कान आणि जुनैद पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले. या दोघांमध्ये जवळीक वाढली. 

निकाहसाठी जुनैदने ठेवली अट

जुनैद आणि मुस्कान दोघे पळून गेले होते. या दोघांना नातेवाईकांनी शोधले. मुलांकडे पाहून वसीमने मुस्कानला माफ केले परंतु कहाणी इथेच संपली नाही. वसीम जेव्हा बाहेर जायचा मुस्कान जुनैदला भेटायला बोलवायची. दोघांमध्ये अनैतिक संबंध इतके वाढले की दोघांनी निकाह करण्याचा निर्णय घेतला. निकाहनंतर हनीमूनला जाण्याचाही प्लॅन बनवला. परंतु निकाहसाठी जुनैदने एक अट ठेवली ती म्हणजे वसीमच्या दोन्ही मुलांना तो सांभाळणार नाही. मुस्कानला कुठल्याही किंमतीत जुनैदसोबत निकाह करायचा होता त्यामुळे तिने मुलांचा काटा काढण्याचा कट रचला. १९ जूनला वसीम कामानिमित्त बाहेर गेला तेव्हा तिने रसगुल्लामध्ये मुलांना विष घालून खायला दिले. त्यानंतर या दोन्ही निष्पाप मुलांचा जीव गेला. सध्या पोलिसांनी मुस्कानला ताब्यात घेतले असून तिचा प्रियकर जुनैद हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी