शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Crime News : दोन मुलांची आई असलेली मामी भाच्याच्या प्रेमात पडली, घर सोडून पळून गेली आणि नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:00 IST

Crime News : सोनू आणि बबिता यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर याबाबत पंचायतही बसली. सगळीकडून येत असलेल्या दबावामुळे हे प्रेमी युगुल चार दिवसांपूर्वी घरातून फरार झाले होते.

रांची - झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील नवलशाही ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मामी आणि भाच्याच्या प्रेमाचा अत्यंत भयावह शेवट झाल्याचे समोर आले आहे. (Crime News)मिळत असलेल्या माहितीनुसार १८ वर्षीय सोनू साव आणि २१ वर्षीय बबिता देवी यांच्यात भाचा आणि मामीचे नाते होते. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेरीस या प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत महिलेला दोन लहान मुले आहेत. (Mami, a mother of two, fell in love with her Nephew, ran away from home and then Both committed suicide)

 या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सोनू आणि बबिता यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर याबाबत पंचायतही बसली. सगळीकडून येत असलेल्या दबावामुळे हे प्रेमी युगुल चार दिवसांपूर्वी घरातून फरार झाले होते. या प्रकरणी महिलेचा पती रमेश साव याने ५ सप्टेंबर रोजी सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार नवलशाही ठाण्यात नोंदवली होती. त्यामध्ये त्याने त्याच्या भाच्यावरच आपल्या पत्नीला पळवून नेल्याचा आरोप केला होता. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी धनबादमध्ये या जोडप्याने विषप्राशन केल्याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर महिलेच्या पतीने धनबाद येथे धाव घेतली मात्र तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टेमनंतर ६ सप्टेंबर रोजी रात्री दोघांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचला. महिलेच्या मृतदेहावर तिच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, या युवकाचा मृतदेह जेव्हा घरी आणण्यात आला तेव्हा या युवकाच्या नातेवाईकांनी आक्रोष केला. तसेच या युवकाची हत्या झाल्याची शंका व्यक्त करत कोडरमा-गिरिडीह मुख्य रस्ता पहाडपूरजवळ बंद केला. त्यानंतर तिथे पोहोचलेल्या पोलिसांनी लोकांना रस्त्यावरून हुसकावून लावले. सोनू साव याची हत्या झाल्याचा आरोप आंदोलनकर्ते लोक करत होते. तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. मृत सोनू साव याचे वडील रामचंद्र साव यांनीही एसपींकडे निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित महिलेचा पती रमेश साव, त्याचा भाऊ पंकज साव, दिनेश साव तसेच महिलेचे मामा यांनी त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करून नंतर विष पाजून त्याची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवारJharkhandझारखंड