शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

माणिकराव पाटील यांचा पैशासाठी अपहरण करून खून, कारंदवाडीच्या तिघांना अटक

By शरद जाधव | Updated: August 28, 2022 13:15 IST

खूनप्रकरणी किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत उर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (२२) व अभिजित चंद्रकांत कणसे (२०, तिघेही रा. कारंदवाडी ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कंत्राटदार माणिकराव पाटील खून प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. पाटील यांचे अपहरण करुन पैसे मिळवण्याचा कट होता, मात्र ते बेशुद्ध पडल्याने हात बांधलेल्या अवस्थेत त्यांना वारणा नदीत फेकून देण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

खूनप्रकरणी किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत उर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (२२) व अभिजित चंद्रकांत कणसे (२०, तिघेही रा. कारंदवाडी ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मूळचे गोटखिंडी (ता. वाळवा) येथील मात्र, सध्या शहरातील राम मंदिर परिसरात माणिकराव पाटील राहण्यास होते. पाटील शासकीय कंत्राटदार म्हणून काम करत होते. शनिवार दि. १३ रोजी रात्री त्यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर कवठेपिरानजवळ वारणा नदीत त्यांचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.

अधीक्षक गेडाम यांनी सांगितले की, संशयित तिघांनाही पैशाची गरज होती. यातील रणदिवे याने लोकांकडून हात उसनवार पैसे उचलले होते ते लोक वारंवार पैसे मागणी करत होते. त्यासाठी पैसे नसल्याने तिघांनी मिळून कोणाला तरी अपहरण करुन त्यांच्याकडून पैसे मागण्याचा कट रचला. त्यानुसार रणदिवे याला माहिती मिळाली की, कंत्राटदार माणिकराव पाटील हे तुंग येथील विश्रांती नाष्टा सेंटर येथे रोज ये-जा करतात. त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती संशयितांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चोरलेल्या मोबाईलवरुन पाटील यांच्याशी संपर्क साधत शनिवारी मिणचे मळा, तुंग येथे प्लॉट दाखवायचा आहे म्हणून बोलावून घेतले. 

याठिकाणी तिघांनी पाटील यांना पकडताना त्यांच्यात झटापट झाली. याचवेळी रस्त्यावरुन लोक ये-जा करत असल्याने संशयितांनी पाटील यांचे तोंड व हातपाय दाबून धरले. यातच ते बेशुद्ध झाले. यानंतर तिघांनी पाटील यांना त्यांच्याच मोटारीच्या डिकीत घालून ते तुंगमार्गे कवठेपिरानकडे गेले. यावेळी रस्त्यात गाडी थांबवून त्यांनी पाहिले असता, पाटील यांची काही हालचाल दिसली नाही. पाटील हे मृत झाले असावेत, असे समजून त्यांनी कवठेपिरान, दुधगावमार्गे जात कुंभोज पुलावरुन त्यांना वारणा नदीच्या पात्रात टाकले व त्यांची मोटार कोंडीग्रेजवळ सोडून ते पुन्हा कारंदवाडीत आले होते. पोलिसांनी तपास करुन तिघांना अटक केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके, सतीश शिंदे, शिवाजी गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी