शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

माणिकराव पाटील यांचा पैशासाठी अपहरण करून खून, कारंदवाडीच्या तिघांना अटक

By शरद जाधव | Updated: August 28, 2022 13:15 IST

खूनप्रकरणी किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत उर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (२२) व अभिजित चंद्रकांत कणसे (२०, तिघेही रा. कारंदवाडी ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कंत्राटदार माणिकराव पाटील खून प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. पाटील यांचे अपहरण करुन पैसे मिळवण्याचा कट होता, मात्र ते बेशुद्ध पडल्याने हात बांधलेल्या अवस्थेत त्यांना वारणा नदीत फेकून देण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

खूनप्रकरणी किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत उर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (२२) व अभिजित चंद्रकांत कणसे (२०, तिघेही रा. कारंदवाडी ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मूळचे गोटखिंडी (ता. वाळवा) येथील मात्र, सध्या शहरातील राम मंदिर परिसरात माणिकराव पाटील राहण्यास होते. पाटील शासकीय कंत्राटदार म्हणून काम करत होते. शनिवार दि. १३ रोजी रात्री त्यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर कवठेपिरानजवळ वारणा नदीत त्यांचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.

अधीक्षक गेडाम यांनी सांगितले की, संशयित तिघांनाही पैशाची गरज होती. यातील रणदिवे याने लोकांकडून हात उसनवार पैसे उचलले होते ते लोक वारंवार पैसे मागणी करत होते. त्यासाठी पैसे नसल्याने तिघांनी मिळून कोणाला तरी अपहरण करुन त्यांच्याकडून पैसे मागण्याचा कट रचला. त्यानुसार रणदिवे याला माहिती मिळाली की, कंत्राटदार माणिकराव पाटील हे तुंग येथील विश्रांती नाष्टा सेंटर येथे रोज ये-जा करतात. त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती संशयितांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चोरलेल्या मोबाईलवरुन पाटील यांच्याशी संपर्क साधत शनिवारी मिणचे मळा, तुंग येथे प्लॉट दाखवायचा आहे म्हणून बोलावून घेतले. 

याठिकाणी तिघांनी पाटील यांना पकडताना त्यांच्यात झटापट झाली. याचवेळी रस्त्यावरुन लोक ये-जा करत असल्याने संशयितांनी पाटील यांचे तोंड व हातपाय दाबून धरले. यातच ते बेशुद्ध झाले. यानंतर तिघांनी पाटील यांना त्यांच्याच मोटारीच्या डिकीत घालून ते तुंगमार्गे कवठेपिरानकडे गेले. यावेळी रस्त्यात गाडी थांबवून त्यांनी पाहिले असता, पाटील यांची काही हालचाल दिसली नाही. पाटील हे मृत झाले असावेत, असे समजून त्यांनी कवठेपिरान, दुधगावमार्गे जात कुंभोज पुलावरुन त्यांना वारणा नदीच्या पात्रात टाकले व त्यांची मोटार कोंडीग्रेजवळ सोडून ते पुन्हा कारंदवाडीत आले होते. पोलिसांनी तपास करुन तिघांना अटक केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके, सतीश शिंदे, शिवाजी गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी