शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 14:55 IST

देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. 

चंद्रकांत दडस, उपसंपादक

नातेवाईक हे प्रत्येक कुटुंबाची एक ताकद असते; मात्र हेच नातेवाईक, जवळचे मित्र आणि ओळखीतले लोक महिलांसाठी शत्रू ठरत आहेत. महिलांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. बलात्कार असो की छळ हा परक्या नव्हे तर आपल्याच लोकांकडून केला जात असेल तर महिलांना यापुढे अधिक सावध पावले टाकत ‘ते’ हात ओळखण्याची गरज आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात महिलांनी तोंड उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.

किती छळ वाढला? - २०२१ मध्ये देशात तब्बल ४ लाख २८ हजार २७८ महिलांचा छळ अथवा अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. २०२० च्या तुलनेत हे प्रमाण १५.३ टक्क्यांनी अधिक आहे. - २०२० मध्ये या प्रकरणांमध्ये ३,७१,५०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सर्वाधिक गुन्हे (३१%) हे पती किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून छळ केल्याची आहेत. महिला अपहरणाच्या १७ टक्के घटना देशात घडल्या आहेत.

शरीरावर ओरखडे -- देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. - देशात बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडत असून, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. - यातही १८ ते ३० वर्षांच्या महिलांवर ओरखडे ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पतीकडून नेमका कधी छळ होतो? -लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचे नऊ दिवस अगदी मजेत जातात. सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर लगेच छळ करण्यास सुरुवात होते. लग्न झाल्यानंतर २ ते ४ वर्षांच्या काळात हे प्रमाण अधिक वाढते, तर १० वर्षांहून अधिक काळ छळ झालेल्या महिलांचे प्रमाण देशात २६ टक्के अधिक आहे. 

सर्वाधिक छळ कोणत्या राज्यात? -- महिलांवर भावनिक, शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण देशात ३१.९ टक्के आहे, तर कर्नाटक राज्यात सर्वाधिक (४८.४ टक्के) छळ केला जातो.- त्यापाठोपाठ बिहार (४२.५ टक्के), मणिपूर (४१.६ टक्के), तेलंगणा (४०.४ टक्के), उत्तर प्रदेश (३७.३ टक्के) येथे महिलांवर अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. - महाराष्ट्रामध्ये २८.२ टक्के महिलांचा छळ केला जातो. यातही लैंगिक छळ करणाऱ्या राज्यात कर्नाटक आघाडीवर असून, महाराष्ट्रात महिलांना मारहाणीचे प्रमाण २४.४ टक्के इतके आहे.

महिला तोंड उघडतात? -ज्या तरुणी अथवा महिलांवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाला आहे, त्या याबाबत कुणाकडेच अधिक बोलत नाहीत. त्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुणाचीही मदत न घेता निमूटपणे अत्याचार सहन करतात.

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी