शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 14:55 IST

देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. 

चंद्रकांत दडस, उपसंपादक

नातेवाईक हे प्रत्येक कुटुंबाची एक ताकद असते; मात्र हेच नातेवाईक, जवळचे मित्र आणि ओळखीतले लोक महिलांसाठी शत्रू ठरत आहेत. महिलांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. बलात्कार असो की छळ हा परक्या नव्हे तर आपल्याच लोकांकडून केला जात असेल तर महिलांना यापुढे अधिक सावध पावले टाकत ‘ते’ हात ओळखण्याची गरज आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात महिलांनी तोंड उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.

किती छळ वाढला? - २०२१ मध्ये देशात तब्बल ४ लाख २८ हजार २७८ महिलांचा छळ अथवा अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. २०२० च्या तुलनेत हे प्रमाण १५.३ टक्क्यांनी अधिक आहे. - २०२० मध्ये या प्रकरणांमध्ये ३,७१,५०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सर्वाधिक गुन्हे (३१%) हे पती किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून छळ केल्याची आहेत. महिला अपहरणाच्या १७ टक्के घटना देशात घडल्या आहेत.

शरीरावर ओरखडे -- देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. - देशात बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडत असून, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. - यातही १८ ते ३० वर्षांच्या महिलांवर ओरखडे ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पतीकडून नेमका कधी छळ होतो? -लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचे नऊ दिवस अगदी मजेत जातात. सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर लगेच छळ करण्यास सुरुवात होते. लग्न झाल्यानंतर २ ते ४ वर्षांच्या काळात हे प्रमाण अधिक वाढते, तर १० वर्षांहून अधिक काळ छळ झालेल्या महिलांचे प्रमाण देशात २६ टक्के अधिक आहे. 

सर्वाधिक छळ कोणत्या राज्यात? -- महिलांवर भावनिक, शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण देशात ३१.९ टक्के आहे, तर कर्नाटक राज्यात सर्वाधिक (४८.४ टक्के) छळ केला जातो.- त्यापाठोपाठ बिहार (४२.५ टक्के), मणिपूर (४१.६ टक्के), तेलंगणा (४०.४ टक्के), उत्तर प्रदेश (३७.३ टक्के) येथे महिलांवर अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. - महाराष्ट्रामध्ये २८.२ टक्के महिलांचा छळ केला जातो. यातही लैंगिक छळ करणाऱ्या राज्यात कर्नाटक आघाडीवर असून, महाराष्ट्रात महिलांना मारहाणीचे प्रमाण २४.४ टक्के इतके आहे.

महिला तोंड उघडतात? -ज्या तरुणी अथवा महिलांवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाला आहे, त्या याबाबत कुणाकडेच अधिक बोलत नाहीत. त्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुणाचीही मदत न घेता निमूटपणे अत्याचार सहन करतात.

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी