शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
3
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
4
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
5
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
6
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
7
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
8
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
9
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
10
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
11
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
12
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
13
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
14
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
15
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
16
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
17
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
18
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
19
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
20
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 14:55 IST

देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. 

चंद्रकांत दडस, उपसंपादक

नातेवाईक हे प्रत्येक कुटुंबाची एक ताकद असते; मात्र हेच नातेवाईक, जवळचे मित्र आणि ओळखीतले लोक महिलांसाठी शत्रू ठरत आहेत. महिलांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. बलात्कार असो की छळ हा परक्या नव्हे तर आपल्याच लोकांकडून केला जात असेल तर महिलांना यापुढे अधिक सावध पावले टाकत ‘ते’ हात ओळखण्याची गरज आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात महिलांनी तोंड उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.

किती छळ वाढला? - २०२१ मध्ये देशात तब्बल ४ लाख २८ हजार २७८ महिलांचा छळ अथवा अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. २०२० च्या तुलनेत हे प्रमाण १५.३ टक्क्यांनी अधिक आहे. - २०२० मध्ये या प्रकरणांमध्ये ३,७१,५०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सर्वाधिक गुन्हे (३१%) हे पती किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून छळ केल्याची आहेत. महिला अपहरणाच्या १७ टक्के घटना देशात घडल्या आहेत.

शरीरावर ओरखडे -- देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. - देशात बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडत असून, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. - यातही १८ ते ३० वर्षांच्या महिलांवर ओरखडे ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पतीकडून नेमका कधी छळ होतो? -लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचे नऊ दिवस अगदी मजेत जातात. सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर लगेच छळ करण्यास सुरुवात होते. लग्न झाल्यानंतर २ ते ४ वर्षांच्या काळात हे प्रमाण अधिक वाढते, तर १० वर्षांहून अधिक काळ छळ झालेल्या महिलांचे प्रमाण देशात २६ टक्के अधिक आहे. 

सर्वाधिक छळ कोणत्या राज्यात? -- महिलांवर भावनिक, शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण देशात ३१.९ टक्के आहे, तर कर्नाटक राज्यात सर्वाधिक (४८.४ टक्के) छळ केला जातो.- त्यापाठोपाठ बिहार (४२.५ टक्के), मणिपूर (४१.६ टक्के), तेलंगणा (४०.४ टक्के), उत्तर प्रदेश (३७.३ टक्के) येथे महिलांवर अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. - महाराष्ट्रामध्ये २८.२ टक्के महिलांचा छळ केला जातो. यातही लैंगिक छळ करणाऱ्या राज्यात कर्नाटक आघाडीवर असून, महाराष्ट्रात महिलांना मारहाणीचे प्रमाण २४.४ टक्के इतके आहे.

महिला तोंड उघडतात? -ज्या तरुणी अथवा महिलांवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाला आहे, त्या याबाबत कुणाकडेच अधिक बोलत नाहीत. त्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुणाचीही मदत न घेता निमूटपणे अत्याचार सहन करतात.

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी