शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
3
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
4
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
5
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
6
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
7
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
8
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
9
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
10
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
11
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
12
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
13
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
14
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
15
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
'या' वस्तूंवर GST कपातीची शक्यता; जीएसटी काऊन्सिल करू शकते घोषणा, कोणते आहेत प्रोडक्ट?
17
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
18
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
19
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
20
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
Daily Top 2Weekly Top 5

२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:52 IST

विवाहबंधनात अडकल्यानंतर हे कपल श्रीलंकेला गेलं होतं. मात्र १० दिवसांची ट्रिप असतानाही अवघ्या ५ दिवसांतच ते अचानक परत आलं.

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील एका दाम्पत्याच्या मृत्यूचं गूढ अधिकच गडद होत चाललं आहे. आधी पत्नीने बंगळुरूमध्ये आत्महत्या केली, त्यानंतर दोन दिवसांनी पतीने बंगळूरूहून नागपुरात येऊन एका हॉटेलमध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं. इतकंच नाही तर पतीच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र त्यातून त्या वाचल्या आहेत. आता या घटनेत एक नवीन माहिती समोर आली आहे.

विविध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि गानवी यांच्यात हनिमूनदरम्यान लग्नापूर्वीच्या एका नात्यावरून जोरदार भांडण झालं होतं. २९ ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर हे कपल श्रीलंकेला गेलं होतं. मात्र १० दिवसांची ट्रिप असतानाही अवघ्या ५ दिवसांतच ते अचानक परत आलं.

हनिमून ट्रिपदरम्यान झाला वाद

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, श्रीलंकेत असताना गानवी आणि सूरजमध्ये वाद झाला होता. एका नातेवाईकाने असा दावा केला आहे की, गानवीला हे लग्न पुढे टिकवायचं नव्हतं. गानवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली. यानंतर बंगळुरूमध्ये सूरजच्या घरासमोर निदर्शने झाली आणि काही लोकांनी घरावर हल्लाही केला. या सर्व प्रकारामुळे सूरज प्रचंड घाबरला होता आणि याच भीतीपोटी तो बंगळुरू सोडून नागपूरला निघून गेला, असा दावा त्याच्या आजोबांनी केला आहे.

कुटुंबीयांनी केला समेट घडवण्याचा प्रयत्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेहून परतल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी सूरज आणि गानवीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. गानवी आपल्या माहेरी परतली आणि काही दिवसांतच तिने टोकाचं पाऊल उचललं. मात्र श्रीलंकेत नक्की कोणत्या 'नात्या'वरून वाद झाला होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सूरज आणि आई प्रचंड घाबरले

सूरजचे आजोबा संजय यांनी हुंड्याची मागणी केल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गानवीच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं. घरासमोर झालेली निदर्शनं आणि हल्ल्यामुळे सूरज व त्याची आई प्रचंड घाबरले होते, त्यामुळे त्यांना शहर सोडावं लागलं. सूरजच्या भावानेही असा दावा केला की, सूरजच्या शोधात सुमारे ३० जणांनी त्यांच्या घरावर धाड टाकली होती. यामुळेच सूरजकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.

English
हिंदी सारांश
Web Title : Couple's suicide after honeymoon in Sri Lanka: A tragic end?

Web Summary : A couple's honeymoon trip to Sri Lanka ended tragically after a dispute. The wife committed suicide in Bangalore, followed by the husband in Nagpur. Dowry harassment allegations and family pressure are suspected causes.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटकPoliceपोलिसmarriageलग्नDeathमृत्यू