शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: मुंबई हाय अलर्टवर!; ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:09 IST

खासकरून मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरील गस्त वाढवली आहे. 

ठळक मुद्दे आज सकाळी हवाई दलाच्या यशस्वी कारवाईची माहिती समोर आली. पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बँगलोर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईभारतीय हवाई दलाने काल मध्यरात्री नियंत्रण रेषा (LOC)ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती. या हल्ल्याच्या सुत्रधारांचा भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी 100 तासांमध्ये खात्मा केला. मात्र, आपल्या 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवा, अशी मागणी जोर धरत होती. यानंतर आज सकाळी हवाई दलाच्या यशस्वी कारवाईची माहिती समोर आली. या कारवाईमुळे पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे. प्रामुख्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह सात राज्यांत हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळेच खासकरून मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरील गस्त वाढवली आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या बदला घेत भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान बालाकोट, मुझ्झफराबाद, चिकोटीवर बॉम्ब हल्ले केले. जैश ए मोहम्मदच्या दृष्टीने यातील बालाकोटचं महत्त्व फार मोठं आहे. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरची कंदहार प्रकरण घडलं. त्यावेळी भारताला अजहरची सुटका करावी लागली. त्यानंतर अजहरने त्याचा मोठा तळ बालाकोटमध्ये उभारला. भारतीय हवाई दलाने याच तळाला लक्ष्य करत जैशला मोठा दणका दिला.  भारताने LOC ओलांडून १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना आणि राज्यांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या स्थळांवरील गस्त वाढवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बँगलोर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारताने केलेल्या या हल्ल्याला पाकिस्तानकडूनही प्रतिउत्तर मिळू शकते. त्यामुळे देशातील सर्व शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलला दहशतवाद्यांनी नेहमी लक्ष्य केलं आहे. या पूर्वीही पकडण्यात आलेल्या संशयितांकडून लोकल आणि एक्सप्रेसमध्ये स्फोट घडवून आणण्याचे कट उधळवले आहेत. त्यामुळे लोकलच्या प्रत्येक स्थानकावर गस्त वाढवली आहे. सीसीटिव्हीच्या नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जात आहे. तसेच मुंबईत प्रवेश करणाऱ्या चारही एंट्री पाॅईंटवर गस्त वाढवण्यात आली आहे. शहराला लागून असलेल्या समुद्रातील ९४ लँडीग पाॅईंटवरही पोलिसांनी गस्त वाढवली आहे.त्याचप्रमाणे विमानतळावरील सुरक्षेतही वाढ केली आहे. 

टॅग्स :Policeपोलिसpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMumbaiमुंबईKarnatakकर्नाटकRajasthanराजस्थानGujaratगुजरातUttar Pradeshउत्तर प्रदेशIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक