पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:04 IST2025-08-19T11:03:58+5:302025-08-19T11:04:10+5:30

एका ३३ वर्षीय तरुणाने एका विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केले. केवळ लग्नच नाही, तर रीतसर नोंदणी करून तिला पत्नी म्हणून स्वीकारले. पण..

'He' came into her life, devastated by the death of her husband, and left with a big shock! Something happened to the young woman that... | पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

AI Generated Image

कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका ३३ वर्षीय तरुणाने एका विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केले. केवळ लग्नच नाही, तर रीतसर नोंदणी करून तिला पत्नी म्हणून स्वीकारले. पण, जेव्हा ती आठ महिन्यांची गर्भवती होती, तेव्हा त्याने तिला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केले. आता ही पीडित महिला न्याय मिळवण्यासाठी पोलिसांकडे मदत मागत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पीडित महिलेचे नाव कीर्ती आहे, तर आरोपी तरुणाचे नाव सुनील आहे. २०२२ मध्ये कीर्तीच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ती आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी एका खासगी कंपनीत काम करत होती. त्याच ठिकाणी तिची ओळख सुनीलशी झाली, जो चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील शिदलाघट्टा तालुक्याच्या अंबिगनहल्ली गावाचा रहिवासी आहे. सुनीलने कीर्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न केले आणि चिक्कबल्लापूरच्या उप-नोंदणी कार्यालयात विवाहाची नोंदणीही केली.

लग्नानंतर काही काळ सर्व काही ठीक चालले होते, पण जेव्हा कीर्ती आठ महिन्यांची गर्भवती होती, तेव्हा सुनीलने तिला सोडून दिले. कुटुंबाकडून विरोध होत असल्याचे कारण सांगून त्याने कीर्तीला घरी सोडून दिले आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केले.

पीडित महिलेला मारहाण

सुनीलने आपल्याला धोका दिल्याचे लक्षात आल्यावर कीर्ती न्याय मिळवण्यासाठी त्याच्या अंबिगनहल्ली येथील घरी पोहोचली. मात्र, तिथे सुनीलच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी तिला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच ११२ पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्भवती महिलेला वाचवले. त्यानंतर तिला चिक्कबल्लापूरच्या मातृ आणि शिशु रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यापूर्वीही सुनीलने कीर्तीच्या पहिल्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यावेळी सुनीलने एका पत्रावर सही करून गर्भवती पत्नीची चांगली काळजी घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्याने हे आश्वासन मोडले आहे. पतीच्या मृत्यूनंतर एकटी पडलेल्या कीर्तीला वाटले होते की सुनील तिचा आधार बनेल, पण त्याने तिचा विश्वासघात केला आहे. आता पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: 'He' came into her life, devastated by the death of her husband, and left with a big shock! Something happened to the young woman that...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.