शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारातील फरार आरोपी अखेर गजाआड, ११ दिवसांनी लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:28 IST

हरियाणाच्या रेवाडीमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून दोन जणांना अटक करण्यात आली. त्यात लष्करातील जवानाचाही समावेश आहे. ११ दिवस ते फरार होते.

नवी दिल्ली - हरियाणाच्या रेवाडीमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून दोन जणांना अटक करण्यात आली. त्यात लष्करातील जवानाचाही समावेश आहे. ११ दिवस ते फरार होते. विशेष तपास पथकाने अखेर त्यांचा माग काढला. कोणत्याही वकिलाने आरोपींचे वकीलपत्र घ्यायचे नाही, असे आवाहन महापंचायतीमध्ये करण्यात आले.निशू फोगाट याला यापूर्वीच पकडण्यात आले. रविवारी पोलिसांनी मनीष आणि पंकज यांना पकडले. दोघांना महेंद्रगड जिल्ह्यातील सतनाली गावात अटक करण्यात आली. नाहड रेस्ट हाऊसमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. दोघांकडे चौकशी सुरू आहे. शेतातील घराचा मालक व तीन आरोपी अशा चार जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. याच घरात घटना घडली होती.हरियाणातील महेंद्रगडमध्ये १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या मुलीची शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उज्ज्वल आहे. रेल्वेची परीक्षा देण्यासाठी तिने कनीना येथे शिकवणी लावली होती. पंकज, मनीष व निशू यांनी पीडितेचे कनीना येथून अपहरण केले.१२ तारखेला रेवाडी-झज्जर जिल्ह्याच्या सीमेवर शेतात नेले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. रक्तस्राव झाला. एकूण १२ जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या मुलीला अतिरक्तस्राव होऊ लागल्याने एका बसथांब्यावर तिला सोडून ते पळून गेले. या अत्याचारामुळे देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे.ज्या शेतघरात विद्यार्थिनीवर बलात्कार झाला, तिचा मालक दीनदयाल याने त्या घराचे रूपांतर मद्यालयात केले होते. सामूहिक बलात्कारातील आरोपी अनेकदा तेथे गेले होते. निशू याच्या फेसबुक अकाऊंटमधील व्हिडिओमध्ये हे शेतघर दिसते.वकीलपत्र न घेण्याचे आवाहनदरम्यान, नुकत्याच झालेल्या कोसली कस्बा येथील महापंचायतीमध्ये २५ गावांमधील नागरिकांनी भाग घेतला. त्यावेळी कुणीही वकील आरोपींचा खटला लढणार नाही, असे ठरविण्यात आले. या महापंचायतीने राज्यपालांना निवेदन देण्याचे ठरविले आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.मानसिकता बदलत नाहीकेंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह म्हणाले, फरार आरोपींना अटक झाली आहे. त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. कायदा त्याच्या चौकटीत काम करतो, मात्र त्यामुळे लोकांची मानसिकता बदलू शकत नाही. बलात्कार रोखण्यासाठी समाजातूनच प्रयत्न झाले पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी