शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची आत्महत्या; ग्रामस्थांनी महिलेला दिली भयंकर शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 17:31 IST

Crime News : गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला भयंकर शिक्षा दिली आहे. केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला बेदम मारहाण केली आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अफेअरबाबत समजताच 2 तरुण मुलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला भयंकर शिक्षा दिली आहे. केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला बेदम मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, 

महिलेच्या 22 वर्षीय कृष्ण दास आणि 20 वर्षीय कौशिक दास या दोन मुलांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला. आईच्या प्रेम प्रकरणाबद्दल मुलांना माहिती झालं होतं. याच कारणामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच गावातील लोकांनी या महिलेसह तिच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचाही संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर आता मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावातील महिलांनी स्वतःच या मुलांच्या आईला शिक्षा दिली आहे. 

महिलांनी तिला केसाला पकडून रस्त्यावर ओढत आणलं. यानंतर तिला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी माहिती देताना आरामबागचे एसडीपीओ अभिषेक मंडल यांनी महिलेला मारहाण केली गेली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेच्या दोन मुलांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यावर हे स्प्ष्ट होईल असं म्हटलं आहे. या प्रकरणात आणखी एक बाजू समोर येत आहे ती अशी की, कृष्णादास याचं काही दिवसांपूर्वी आपली पत्नी पिया हिच्यासोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली होती. 

कृष्णा दासने यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा कौशकला हे माहिती झालं तेव्हा तो हे दुःख सहन करू शकला नाही आणि त्यानेही गळफास घेतला. तर दुसरीकडे कृष्णा दासच्या पत्नीने पती आणि दिराच्या हत्येचा आरोप आपल्या सासूवर केला आहे. सासूनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून या दोघांची हत्या केली आहे असं म्हटलं आहे. आपल्याला खोट्या आरोपात फसवलं जात असल्याचं या मुलांच्या आईचं म्हणणं आहे. मुलाचं सुनेसोबत भांडण झालं होतं, याच कारणामुळे त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिसDeathमृत्यू