शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धक्कादायक! आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची आत्महत्या; ग्रामस्थांनी महिलेला दिली भयंकर शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 17:31 IST

Crime News : गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला भयंकर शिक्षा दिली आहे. केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला बेदम मारहाण केली आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अफेअरबाबत समजताच 2 तरुण मुलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला भयंकर शिक्षा दिली आहे. केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला बेदम मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, 

महिलेच्या 22 वर्षीय कृष्ण दास आणि 20 वर्षीय कौशिक दास या दोन मुलांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला. आईच्या प्रेम प्रकरणाबद्दल मुलांना माहिती झालं होतं. याच कारणामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच गावातील लोकांनी या महिलेसह तिच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचाही संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर आता मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावातील महिलांनी स्वतःच या मुलांच्या आईला शिक्षा दिली आहे. 

महिलांनी तिला केसाला पकडून रस्त्यावर ओढत आणलं. यानंतर तिला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी माहिती देताना आरामबागचे एसडीपीओ अभिषेक मंडल यांनी महिलेला मारहाण केली गेली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेच्या दोन मुलांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यावर हे स्प्ष्ट होईल असं म्हटलं आहे. या प्रकरणात आणखी एक बाजू समोर येत आहे ती अशी की, कृष्णादास याचं काही दिवसांपूर्वी आपली पत्नी पिया हिच्यासोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली होती. 

कृष्णा दासने यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा कौशकला हे माहिती झालं तेव्हा तो हे दुःख सहन करू शकला नाही आणि त्यानेही गळफास घेतला. तर दुसरीकडे कृष्णा दासच्या पत्नीने पती आणि दिराच्या हत्येचा आरोप आपल्या सासूवर केला आहे. सासूनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून या दोघांची हत्या केली आहे असं म्हटलं आहे. आपल्याला खोट्या आरोपात फसवलं जात असल्याचं या मुलांच्या आईचं म्हणणं आहे. मुलाचं सुनेसोबत भांडण झालं होतं, याच कारणामुळे त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिसDeathमृत्यू