शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

माता न तू वैरिणी! आईनेच घेतला 3 मुलांचा जीव; चहामधून दिलं विष, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 7:16 PM

Crime News : पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होत असतात. काही वाद हे विकोपाला जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका महिलेचे पतीसोबत भांडण झाल्यावर तिने आपल्या तीन मुलांना विष पाजून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या सुहवाल पोलीस स्टेशन हद्दीतील ढढ़नी भानमल राय गावात एका महिलेचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर महिलेने कोणताच विचार न करता रागाच्या भरात तिच्या तीन मुलांना विष पाजले. विष प्यायल्यानंतर तिन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि मुलांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी महिलेचं पती आणि दिरासोबत मोबाईलवर वाद झाला. यामुळे महिलेला राग आला आणि तिने तिची दोन मुलं हिमांशू (11), प्रियांशु (8) आणि मुलगी सुप्रिया (7) यांची हत्या केली. दुपारी चार वाजता त्यांना चहामध्ये विष मिसळून दिलं. मुलांची प्रकृती बिघडायला लागल्यावर महिलेने याबाबत माहिती दिली. 

घरातील लोकांनी मुलांना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हिमांशू आणि सुप्रियाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं. पण नंतर उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. महिलेला चार मुलं आहेत. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिचा चौथा मुलगा हा बाहेर गेला होता. त्यामुळे तो वाचला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश