Narayan Rane : राजकीय राडा! शिवसैनिकांनी केली तोडफोड; भाजप कार्यकर्त्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 15:03 IST2021-08-24T14:37:06+5:302021-08-24T15:03:28+5:30
BJP worker beaten : भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली. या घटनेमुळे शहरात एकच राजकीय खळबळ माजली आहे.

Narayan Rane : राजकीय राडा! शिवसैनिकांनी केली तोडफोड; भाजप कार्यकर्त्याला मारहाण
कल्याण - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी कल्याण शहर कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी शिवसैनिकांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. कार्यालयाच्या फलकावर दगडफेक केली. तसेच भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली. या घटनेमुळे शहरात एकच राजकीय खळबळ माजली आहे.
शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी शिवसैनिकांसह भाजप शहर कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील होते. साळवी यांनी भाजप कार्यालयाच्या फलकावर दगड भिरकावून फलक तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यालयाच्या खिडकीच्या काचा तोडल्या. काचा तोडताना शिवसैनिक अमोल गायकवाड याचा हात रक्तबंबाळ झाला. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाच्या दारावर लाथा मारुन कुलूप बंद दार तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दार तोडण्यास मज्जाव करणा:या भाजप कार्यकर्ता प्रसाद टूमकर याला शिवसैनिकांनी मारहाण करीत कार्यालयापासून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र टूमकर हे काही कार्यालयाचा परिसर सोडण्यास तयार नव्हते. हा सगळा प्रकार घडल्यावर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण घटनास्थळी पोहचले. त्या आधीच शिवसैनिकाचा ताफा टिळकनगर शिवसेना शाखेच्या दिशेने रवाना झाला होता.
कल्याण - शिवसैनिकांनी केली तोडफोड; भाजप कार्यकर्त्याला मारहाण pic.twitter.com/H8JN9JL08d
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2021
या हल्ल्या पश्चात शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, राणे यांनी यापूर्वीही बेताल वक्तव्य केली आहे. आत्ता देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुखही आहेत. त्यांच्या विरोधात राणे यांनी केलेले वक्तव्या प्रकरणी राणे आणि भाजप पक्ष जोर्पयत माफी मागत नाही. तोर्पयत शिवसेना हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, राणे यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांचा संयम सुटला आहे. राणो हे देखील मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री आणि आमच्या पक्ष प्रमुखांच्या विरोधात वारंवार चुकीची वक्तव्ये करीत आहे. ते आत्ता केंद्रीय मंत्री आहेत. भाजपने त्यांना समज द्यावी अन्यथा शिवसैनिक शांत बसणार नाही.