शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
3
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
4
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
5
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
6
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
7
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
8
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
9
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
10
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
11
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
12
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
13
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
14
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
15
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
16
घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...   
17
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
18
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
19
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
20
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशनंतर राजस्थान, दोन अल्पवयीन मुलींवर तीन दिवस सामूहिक बलात्कार?

By बाळकृष्ण परब | Updated: October 1, 2020 14:13 IST

baran girls rape case : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असतानाच आता राजस्थानमदील बारां येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देदोन अल्पवयीन मुलींना कोटा, जयपूर आणि अजमेर येथे नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची आरोपींनी दिली धमकी दोन्ही मुलींनी आपल्या जबाबामध्ये आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितल्याचे बारां येथील पोलिसांचा दावा

जयपूर - देशभरात महिला आणि मुलींवर होत असलेले अत्याचार ही चिंतेची बाब बनले आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असतानाच आता राजस्थानमदील बारां येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांकडून काहीही सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. दोन अल्पवयीन मुलींना कोटा, जयपूर आणि अजमेर येथे नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. तसेच याबाबत पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आरोपींनी सुरुवातीला दोन्ही अल्पवयीन मुलींचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींनी सलग तीन दिवस या तरुणींवर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पीडित मुलींच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पीडित मुली आणि एका अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी पीडित मुलींच्या वडिलांनी आपल्याला न्याय देण्याची विनंती केली. मात्र जेव्हा या मुलींना बोलण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपींनी पोलिसांसमोरच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.पकडण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांना सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आरोपींनी कुटुंबीयांना किंवा पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी पीडित मुलीना दिली आहे. दरम्यान, दोन्ही मुलींनी आपल्या जबाबामध्ये आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितल्याचे बारां येथील पोलिसांनी सांगितले आहे. तसेच दोन्ही मुलींच्या वैद्यकीय चाचणीमध्ये बलात्काराला दुजोरा मिळाला नसल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर एसपींनी सांगितले की, जर पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार त्यांना घाबरवून धमकावून जबाब घेतले गेले असतील तर पुढील कारवाईसाठी परवानगी घेऊन पुन्हा जबाब नोंदवले जातील.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही या मुलींवर बलात्कार झाला नसल्याचे तसेच या मुलींनी आपण स्वेच्छेने तरुणांसोबत फिरायला गेल्याचे आपल्या जबाबात म्हटल्याची माहिती दिली आहे. या घटनेची हाथरस येथील घटनेशी तुलना करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही गहलोत यांनी म्हटले आहे. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानRapeबलात्कार