शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

उत्तर प्रदेशनंतर राजस्थान, दोन अल्पवयीन मुलींवर तीन दिवस सामूहिक बलात्कार?

By बाळकृष्ण परब | Updated: October 1, 2020 14:13 IST

baran girls rape case : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असतानाच आता राजस्थानमदील बारां येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देदोन अल्पवयीन मुलींना कोटा, जयपूर आणि अजमेर येथे नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची आरोपींनी दिली धमकी दोन्ही मुलींनी आपल्या जबाबामध्ये आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितल्याचे बारां येथील पोलिसांचा दावा

जयपूर - देशभरात महिला आणि मुलींवर होत असलेले अत्याचार ही चिंतेची बाब बनले आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असतानाच आता राजस्थानमदील बारां येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांकडून काहीही सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. दोन अल्पवयीन मुलींना कोटा, जयपूर आणि अजमेर येथे नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. तसेच याबाबत पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आरोपींनी सुरुवातीला दोन्ही अल्पवयीन मुलींचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींनी सलग तीन दिवस या तरुणींवर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पीडित मुलींच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पीडित मुली आणि एका अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी पीडित मुलींच्या वडिलांनी आपल्याला न्याय देण्याची विनंती केली. मात्र जेव्हा या मुलींना बोलण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपींनी पोलिसांसमोरच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.पकडण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांना सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आरोपींनी कुटुंबीयांना किंवा पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी पीडित मुलीना दिली आहे. दरम्यान, दोन्ही मुलींनी आपल्या जबाबामध्ये आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितल्याचे बारां येथील पोलिसांनी सांगितले आहे. तसेच दोन्ही मुलींच्या वैद्यकीय चाचणीमध्ये बलात्काराला दुजोरा मिळाला नसल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर एसपींनी सांगितले की, जर पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार त्यांना घाबरवून धमकावून जबाब घेतले गेले असतील तर पुढील कारवाईसाठी परवानगी घेऊन पुन्हा जबाब नोंदवले जातील.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही या मुलींवर बलात्कार झाला नसल्याचे तसेच या मुलींनी आपण स्वेच्छेने तरुणांसोबत फिरायला गेल्याचे आपल्या जबाबात म्हटल्याची माहिती दिली आहे. या घटनेची हाथरस येथील घटनेशी तुलना करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही गहलोत यांनी म्हटले आहे. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानRapeबलात्कार