शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 10:13 IST

Mumbai Crime News : मुंबईत दोन शेजाऱ्यांमधील वाद इतका टोकाला गेला की हाणामारीत त्यांनी एकमेकांचा जीव घेतला.

शेजारी हा आपला पहिला नातेवाईक असतो,असं म्हणतात. मात्र, मुंबईत दोन शेजाऱ्यांमधील वाद इतका टोकाला गेला की हाणामारीत त्यांनी एकमेकांचा जीव घेतला. मुंबईतील गणपत पाटील नगरमध्ये रविवारी संध्याकाळी दोन कुटुंबांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की, त्यात ३ जणांचा मृत्यू आणि ४ जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, गणपत पाटील नगर येथील झोपडपट्टीत राहणारे शेख आणि गुप्ता कुटुंब २०२२ पासून एकमेकांचे शत्रू होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले होते.

जुन्या शत्रुत्वाला लागले हिंसक वळणसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास, हमीद नसिरुद्दीन शेख दारूच्या नशेत राम नवल गुप्ता यांच्या नारळाच्या दुकानाजवळून चालत जात होते आणि या दरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, दोन्ही कुटुंबांनी आपापल्या मुलांना देखील बोलावून घेतले. 

एकमेकांवर केले वार

राम नवल गुप्ता, त्यांचे पुत्र अमर गुप्ता, अरविंद गुप्ता आणि अमित गुप्ता हे घरून धारदार शस्त्रे घेऊन आले आणि हमीद नसिरुद्दीन शेख आणि त्यांचे पुत्र अरमान हमीद शेख आणि हसन हमीद शेख यांच्याशी हाणामारी करण्यास सुरुवात केली. या वादावादीत राम नवल गुप्ता आणि अरविंद गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर अमर गुप्ता आणि अमित गुप्ता गंभीर जखमी झाले. शेख कुटुंबातील हमीद नसिरुद्दीन शेख यांचाही मृत्यू झाला, त्यांचे मुलगे अरमान आणि हसन शेख जखमी झाले आहेत. या घटनेतील सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला असून. एका आरोपीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई