३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:17 IST2025-06-23T14:16:57+5:302025-06-23T14:17:58+5:30
या महिलेला तीन मुलं असून, ती सुमारे १२ वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. या काळात तिचे दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते.

३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
प्रेमसंबंधातून घडलेल्या एका गुन्ह्याने संपूर्ण बिहारमध्ये खळबळ उडवून दिली आहे. राजधानी पाटणाजवळ एका विवाहित महिलेने आपल्या दुसऱ्या प्रियकराची हत्या केली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात तिने तिच्या पहिल्या प्रियकराची मदत घेतली.
या महिलेला तीन मुलं असून, ती सुमारे १२ वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. या काळात तिचे दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते. दुसऱ्या प्रियकराने ब्लॅकमेल केल्यानंतर ती तणावाखाली आली आणि त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
३ मुलांची आई आणि दोन अफेयर
गुडिया नावाची ही महिला बेऊरमधील साईचक परिसरात राहत होती. तिचे लग्न पाटण्यात झाले होते आणि तिला तीन अपत्यं आहेत. पतीपासून वेगळी राहू लागल्यानंतर तिचे एका विजय नावाच्या पुरुषाशी प्रेमसंबंध जुळले. त्यांचे हे नाते तब्बल १४ वर्षे टिकले. या दरम्यान, विजयचा ड्रायव्हर सूरज कुमारशी तिची ओळख झाली आणि कालांतराने त्या दोघांतही जवळीक निर्माण झाली. पुढील ५ वर्षे गुडियाचे सूरजसोबत प्रेमसंबंध होते.
ब्लॅकमेलिंगमुळे हत्या
गुडिया आणि सूरज यांचे नाते तणावपूर्ण बनत गेले. सूरजने तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आणि तो तिला सतत धमकी देत होता. या ब्लॅकमेलिंगपासून सुटका मिळवण्यासाठी गुडियाने आपल्या पहिल्या प्रियकर विजयकडे मदत मागितली. विजयने त्याचा मित्र अश्वनी कुमारला यामध्ये सामील केलं आणि तिघांनी मिळून सूरजच्या हत्येचा कट रचला.
खुनाची योजना आणि अंमलबजावणी
मे महिन्यात पाटण्याजवळील परसा बाजार परिसरात सूरजला बोलावण्यात आलं. तिथे विजय आणि अश्वनीने त्याला आधी दारू पाजली, त्यानंतर त्याचा गळा दाबून आणि धारदार शस्त्राने हत्या केली. मृतदेह नंतर परसा बाजारजवळील एतवारपूर परिसरातील एका शेतात फेकण्यात आला.
पोलीस तपास आणि अटकेची कारवाई
हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच गुडिया व तिच्या दोघा साथीदारांचा गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला. पोलिसांनी गुडिया, विजय आणि अश्वनीला अटक केली असून, त्यांच्याकडून हत्येत वापरलेले शस्त्र, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सध्या या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील चौकशी करत आहेत.