शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

स्वच्छता हा संस्कार म्हणून स्वीकारावा कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील : उमवित क्लीन कॅम्पस उपक्रम

By admin | Published: November 05, 2016 12:13 AM

जळगाव : स्वच्छता हा जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. यापेक्षा संस्कार म्हणून आपण त्याचा स्वीकार करून विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने परिवारासह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून श्रम संस्काराचा वसा आणि वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत अभियानातंर्गत राबविल्या जाणाज्या स्वच्छता पंधरवड्याच्या (क्लीन कॅम्पस) उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.

जळगाव : स्वच्छता हा जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. यापेक्षा संस्कार म्हणून आपण त्याचा स्वीकार करून विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने परिवारासह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून श्रम संस्काराचा वसा आणि वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत अभियानातंर्गत राबविल्या जाणाज्या स्वच्छता पंधरवड्याच्या (क्लीन कॅम्पस) उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.
सुरुवातीला प्रा. संजय पत्की, अलका चव्हाण, तेजस मराठे, गोपाळ ठाकरे, धनंजय देशमुख, अजिंक्य इनामदार यांनी राम का गुणगान, संत मिराबाई यांच्या मिरा हो गयी मगन या भजनाने केली. स्वच्छता अभियानाची शपथ कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी दिली.

१ ते १५ नोव्हेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा परिसर, विद्यापीठाचे सर्व सॅटेलाईट सेंटर ( अमळनेर, धुळे, नंदूरबार) येथे परिसर स्वच्छता कार्यक्रम होतील. ११ रोजी सागर पार्क ते जी.एस.ग्राऊंड परिसर स्वच्छता , १२ रोजी प्रशासकीय इमारत, अधिसभा सभागृह, पदवीप्रदान सभागृह, पाणी पुरवठा इमारत आणि पाळधी गाव व परिसर, १३ रोजी मुले व मुलींचे वसतिगृह, १५ रोजी परिसर स्वच्छता व श्रमदानाने या पंधरवड्याचा समारोप होईल.
प्रास्ताविक उपकुलसचिव डॉ.ज्ञानदेव नीलवर्ण यांनी केले.कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन, बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर, वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.कर्‍हाड, परीक्षा नियंत्रक डी.एन.गुजराथी, प्रा.सत्येंद्र मिश्रा, प्रा.जे.बी.नाईक आदी उपस्थित होते. सागरमित्र अभियानाचे विशाल सोनकुळ यांनी देशातील व परदेशातील विविध शाळांमध्ये स्वच्छतेसंदर्भात राबविण्यात येणार्‍या चळवळींविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक सत्यजित साळवे यांनी केले.