शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तुमची जलवाहिनी तर आमची गॅसवाहिनी; शहरात भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेला शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 14:16 IST

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह दिला.

औरंगाबाद : शहराच्या राजकारणात आता गॅस आणि जलवाहिनीचा बोलबोला सुरू आला आहे. शिवसेनेच्या गडात बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत भाजपने २ हजार कोटींच्या पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) च्या कामाच्या भूमिपूजनाचा बार उडविला. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून महापालिका, जि. प., पं. स.च्या आगामी निवडणुकीसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर संघटन दाखवून शिवसेनेला शह देत माजी खासदारांना टीकेचे लक्ष्य केले. जलवाहिनीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करीत डिसेंबर २०२२ पर्यंत पीएनजीचे वितरण शहरात होईल, असा दावा करीत भाजपने शिवसेनेवर टीका केली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, शहरात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. ५५ कि. मी. लांबून पाणी आणावे लागते. राज्य शासनाचे औरंगाबादकडे लक्ष नाही. पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने होत आहे. जॅकवेलसाठी अर्ज केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान कार्यक्रमाला गर्दी किती आहे, नागरिक कुठून आले आहेत. कार्यक्रमात काही गडबड, प्रशासनातील कोण अधिकारी उपस्थित आहेत, याची माहिती शिवसेनेकडून घेण्यात येत होती. महाविकास आघाडीच्या आमदारांनी, एमआयएमच्या खासदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. बीपीसीएलने निमंत्रितांसाठी काढलेल्या पत्रिकेत एमआयएम, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व लोकप्रतिनिधींची नावे होती.

महिलांचा सन्मानस्वयंपाकासाठी गॅस लागतो, बहुतांशपणे महिलांशी निगडित हे काम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्वाधिक महिलांची गर्दी होती. त्यांना फेटे बांधून सभामंडपात बसविण्यात आले होते.

माजी खासदाराने २० वर्षांत काय केले ?आ. हरिभाऊ बागडे यांनी खैरेंचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, यापूर्वीच्या खासदाराने २० वर्षांत पाणी दिले नाही. समांतर जलवाहिनीची योजना आणली, ती गुंडाळली. पंतप्रधान आवास याेजनेचे कामही शासनाने हळूहळू करण्यास प्रशासनाला सांगितले असेल. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, २० वर्षे खासदार म्हणून राहिले, पण एकही काम नाही केले. गॅस पाईपलाईनसाठी निवेदन दिल्यामुळेच योजना आल्याचे माजी खासदार सांगत आहेत. मी आता रेल्वेची कामे पूर्णत्वाकडे नेत आहे, तर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना मीच निवेदन दिले होते, म्हणून आता काम होत असल्याचे ते सांगत असल्याचा टोला त्यांनी लावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका