शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

तुमची जलवाहिनी तर आमची गॅसवाहिनी; शहरात भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेला शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 14:16 IST

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह दिला.

औरंगाबाद : शहराच्या राजकारणात आता गॅस आणि जलवाहिनीचा बोलबोला सुरू आला आहे. शिवसेनेच्या गडात बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत भाजपने २ हजार कोटींच्या पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) च्या कामाच्या भूमिपूजनाचा बार उडविला. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून महापालिका, जि. प., पं. स.च्या आगामी निवडणुकीसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर संघटन दाखवून शिवसेनेला शह देत माजी खासदारांना टीकेचे लक्ष्य केले. जलवाहिनीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करीत डिसेंबर २०२२ पर्यंत पीएनजीचे वितरण शहरात होईल, असा दावा करीत भाजपने शिवसेनेवर टीका केली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, शहरात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. ५५ कि. मी. लांबून पाणी आणावे लागते. राज्य शासनाचे औरंगाबादकडे लक्ष नाही. पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने होत आहे. जॅकवेलसाठी अर्ज केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान कार्यक्रमाला गर्दी किती आहे, नागरिक कुठून आले आहेत. कार्यक्रमात काही गडबड, प्रशासनातील कोण अधिकारी उपस्थित आहेत, याची माहिती शिवसेनेकडून घेण्यात येत होती. महाविकास आघाडीच्या आमदारांनी, एमआयएमच्या खासदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. बीपीसीएलने निमंत्रितांसाठी काढलेल्या पत्रिकेत एमआयएम, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व लोकप्रतिनिधींची नावे होती.

महिलांचा सन्मानस्वयंपाकासाठी गॅस लागतो, बहुतांशपणे महिलांशी निगडित हे काम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्वाधिक महिलांची गर्दी होती. त्यांना फेटे बांधून सभामंडपात बसविण्यात आले होते.

माजी खासदाराने २० वर्षांत काय केले ?आ. हरिभाऊ बागडे यांनी खैरेंचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, यापूर्वीच्या खासदाराने २० वर्षांत पाणी दिले नाही. समांतर जलवाहिनीची योजना आणली, ती गुंडाळली. पंतप्रधान आवास याेजनेचे कामही शासनाने हळूहळू करण्यास प्रशासनाला सांगितले असेल. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, २० वर्षे खासदार म्हणून राहिले, पण एकही काम नाही केले. गॅस पाईपलाईनसाठी निवेदन दिल्यामुळेच योजना आल्याचे माजी खासदार सांगत आहेत. मी आता रेल्वेची कामे पूर्णत्वाकडे नेत आहे, तर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना मीच निवेदन दिले होते, म्हणून आता काम होत असल्याचे ते सांगत असल्याचा टोला त्यांनी लावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका