शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

तुमची जलवाहिनी तर आमची गॅसवाहिनी; शहरात भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेला शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 14:16 IST

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह दिला.

औरंगाबाद : शहराच्या राजकारणात आता गॅस आणि जलवाहिनीचा बोलबोला सुरू आला आहे. शिवसेनेच्या गडात बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत भाजपने २ हजार कोटींच्या पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) च्या कामाच्या भूमिपूजनाचा बार उडविला. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून महापालिका, जि. प., पं. स.च्या आगामी निवडणुकीसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर संघटन दाखवून शिवसेनेला शह देत माजी खासदारांना टीकेचे लक्ष्य केले. जलवाहिनीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करीत डिसेंबर २०२२ पर्यंत पीएनजीचे वितरण शहरात होईल, असा दावा करीत भाजपने शिवसेनेवर टीका केली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, शहरात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. ५५ कि. मी. लांबून पाणी आणावे लागते. राज्य शासनाचे औरंगाबादकडे लक्ष नाही. पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने होत आहे. जॅकवेलसाठी अर्ज केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान कार्यक्रमाला गर्दी किती आहे, नागरिक कुठून आले आहेत. कार्यक्रमात काही गडबड, प्रशासनातील कोण अधिकारी उपस्थित आहेत, याची माहिती शिवसेनेकडून घेण्यात येत होती. महाविकास आघाडीच्या आमदारांनी, एमआयएमच्या खासदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. बीपीसीएलने निमंत्रितांसाठी काढलेल्या पत्रिकेत एमआयएम, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व लोकप्रतिनिधींची नावे होती.

महिलांचा सन्मानस्वयंपाकासाठी गॅस लागतो, बहुतांशपणे महिलांशी निगडित हे काम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्वाधिक महिलांची गर्दी होती. त्यांना फेटे बांधून सभामंडपात बसविण्यात आले होते.

माजी खासदाराने २० वर्षांत काय केले ?आ. हरिभाऊ बागडे यांनी खैरेंचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, यापूर्वीच्या खासदाराने २० वर्षांत पाणी दिले नाही. समांतर जलवाहिनीची योजना आणली, ती गुंडाळली. पंतप्रधान आवास याेजनेचे कामही शासनाने हळूहळू करण्यास प्रशासनाला सांगितले असेल. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, २० वर्षे खासदार म्हणून राहिले, पण एकही काम नाही केले. गॅस पाईपलाईनसाठी निवेदन दिल्यामुळेच योजना आल्याचे माजी खासदार सांगत आहेत. मी आता रेल्वेची कामे पूर्णत्वाकडे नेत आहे, तर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना मीच निवेदन दिले होते, म्हणून आता काम होत असल्याचे ते सांगत असल्याचा टोला त्यांनी लावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका