शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याने मोडला यंदा टँकरचा रेकॉर्ड

By admin | Updated: May 17, 2016 00:34 IST

औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,७१६ गावे आणि ९६० वाड्यांना ३,६५० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात ५६ लाख १६ हजार ६६६ ग्रामीण भागातील

३,६५० टँकर : ५६ लाख लोकांची पाण्यासाठी वणवण औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,७१६ गावे आणि ९६० वाड्यांना ३,६५० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात ५६ लाख १६ हजार ६६६ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याासाठी वणवण करावी लागते आहे. गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत ३ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा गेला होता. यावर्षी मेअखेरपर्यंत ४ हजार टँकरचा आकडा जाण्याची शक्यता आहे. विभागात १५ मेअखेर औरंगाबाद जिल्ह्यात ६१६ गावे व २३ वाड्यांसाठी ८३२ टँकरद्वारे, जालन्यात ४६६ गावे आणि ७४ वाड्यांसाठी ५४८ टँकर, परभणीत १९१ गावे ४७ वाड्यांसाठी २५० टँकर, हिंगोलीत ३९ गावे एका वाडीसाठी ४१ टँकर, नांदेडमध्ये १९९ गावे १४३ वाड्यांसाठी ३३१ टँकर, बीडमध्ये ७१० गावे आणि ६०४ वाड्यांसाठी ९१० टँकर, लातूरमध्ये २३५ गावे ५२ वाड्यांसाठी ३२३ टँकर, तर उस्मानाबादमध्ये २६० गावे आणि १६ वाड्यांसाठी ४१५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मागील आठवड्यात २,६१५ गावे आणि ९४९ वाड्यांना ३,४९५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. ४१८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात १३ मेपर्यंत ४१८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील १८७ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ९४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. १२३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ६४, जालन्यात ४३, परभणी ३९, हिंगोली २६, नांदेड ६२, बीडमध्ये ७५, लातूर ५५, उस्मानाबादमध्ये ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.