शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

कामगार रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 8:23 PM

मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.

विभागीय पथक : मुंबईतील आगीच्या घटनेनंतर ईएसआयसीला जागवाळूज महानगर : मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अल्पदरात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआयसी प्रशासनाने पंढरपूर येथे ईएसआयसीची मॉडेल डिस्पेन्सरी उभारली आहे. या इमारतीसाठी ५ कोटी ९१ लाख रुपये खर्च करून २०१२-१३ मध्ये इमारत बांधली. २०१५ मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालय सुरू झाल्यानंतर काही वर्षांत इमारतीच्या भिंतीला तडे जाऊन काचा व फरशा गळून पडायला सुरुवात झाली. यावर दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुन्हा लाखो रुपये खर्च केले, तरीही इमारतीची पडझड थांबलेली नाही. नोव्हेंबरमध्ये दिवाळीदरम्यान या रुग्णालयातील इंजेक्शन रूम व ड्रेसिंग रूमच्या मधल्या भिंतीला तडे जाऊन छत कोसळल्याची घटना घडली. प्रशासनाने हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून कमालीची गुप्तता पाळली होती; पण ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. येथील डॉ. व्यंकट जांभळे यांनी माहिती देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

त्यानंतर पुन्हा आठवडाभरापूर्वी सदरील भिंतीचे काही भागाचे छत पडल्याची घटना घडली. याच खोलीत रुग्णांना इंजेक्शन देऊन उपचार केले जातात, तसेच या रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणाही कार्यान्वित नाही. जनरेटर व लिफ्ट अनेक दिवसांपासून बंदावस्थेत आहे. बजाजनगरातील दवाखान्याची तर फारच वाईट अवस्था आहे. भिंतीला व छताला तडे गेल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. पंढरपूर व बजाजनगरातील दवाखान्यात कामगार रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी असते. रुग्णालयाच्या भिंतीचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने कामगारांसह डॉक्टरांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. अग्निशमन यंत्रणा धूळ खात पडल्याने रुग्णालयाला आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईतील घटनेनंतर जागमुंबई अंधेरी येथील घटनेमुळे ईएसआयसी प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने राज्यातील ईएसआयीसी रुग्णालयाच्या सुरक्षेची पाहणी मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी औरंगाबादच्या विभागीय कार्यालयाचे उपसंचालक संजीव यादव, शाखा प्रमुख पद्मनाभन दातार यांच्या पथकाने पंढरपूर येथील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी डॉ. व्यंकट, संतोष दळवी यांची उपस्थिती होती. या विषयी उपसंचालक यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद