शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

कामाला लागा; काँग्रेसला बहुमत मिळवून द्या : अशोकराव चव्हाण यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:49 PM

काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली. 

औरंगाबाद : काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली. 

सागर लॉन्सवर दिवसभर हे शिबीर चालले. प्रारंभी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी आजच्या राजकारणाचे वास्तव मांडले व सरकारवर टीकेची झोड उठवली. तत्पूर्वी मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांनी दीप प्रज्वलित केले.  ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर डॉ. रत्नाकर महाजन यांनी मांडणी केली व नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गॉड फादर करीत तो कसा हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे, याकडे लक्ष वेधले.२०१९ च्या निवडणुकीत या हुकूमशाही प्रवृत्तीचा, झुंडशाहीचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी केले. 

माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी ‘उपेक्षित मागासवर्गीयांबद्दल काँग्रेसची भूमिका’ या विषयावर विवेचन केले. उपहासगर्भ आणि विनोदी शैलीतील भाषणात त्यांनी मोदींच्या भाषणशैलीची नक्कल केली. शांताबाई या गाण्याच्या चालीवर ओळी सादर केल्या. उपेक्षित मागासांसोबत काँग्रेस सतत राहत आली आहे, हे सांगत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे किती फायदे होत आहेत, हे सांगितले. काँग्रेसचे सोशल इंजिनिअरिंगचे धोरण स्वीकारण्याचे आव्हान त्यांनी केले. 

महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांचे हिंदीतून जोशपूर्ण भाषण झाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची कशी अधोगती होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पतंजलीचाच एक दिवस मोठा घोटाळा उघडकीस येईल, अशी शक्यता अभिजित सपकाळ यांनी सोशल मीडियाच्या सादरीकरणातून व्यक्त केली.  देवेंद्र फडणवीस सरकार सहकार चळवळीच्या कसे मुळावर उठले आहे, याचे सुंदर विवेचन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. देशाची आर्थिक परिस्थिती या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश पाडला व अच्छे दिन म्हणण्याने नव्हे तर विकास दर किती वाढला हे महत्त्वाचे असते, हे त्यांनी पटवून दिले. आज लोकांशी संवाद वाढवण्याची गरज आहे. लोकांच्या मनात असंतोष आहे. तो जागवण्याची गरज आहे. कारण कोणताही वर्ग आज खुश नाही. यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा केली; पण  ५६ भाजप आल्या तरी देश काँग्रेसमुक्त होऊ शकणार नाही, असे उद्गार विखे पाटील यांनी काढले. विधान परिषदेतील उपसभापती माणिक ठाकरे यांचेही यावेळी भाषण झाले. श्याम उमाळकर, आ. अब्दुल सत्तार आणि डॉ. पवन डोंगरे यांनी शिबिराच्या कामकाजाचे सूत्रसंचालन केले. मंचावर वरिष्ठ पदाधिका-यांची उपस्थिती होती. 

क्षणचित्रे : - या शिबिराच्या निमित्ताने अलीकडच्या काळातील कार्यकर्त्यांचे अशा पद्धतीचे एकत्रीकरण पहिल्यांदाच पाहावयास मिळाले. त्यातही एक गणवेश व डोक्यावर गांधीटोपी हे चित्र शिस्तीचे दर्शन घडवत होते. - सकाळी १०.०५ ही ध्वजारोहणाची वेळ होती; पण प्रत्यक्षात १०.५० वा. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व नंतर सेवादलाने त्यांना सलामी दिली.- एका भल्या मोठ्या हारात सामावून घेऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मंचावरील पदाधिकारी, वक्ते व नेत्यांच्या गळ्यात काँग्रेसचे तिरंगी उपरणे झळकत होते. - अभिजित सपकाळ यांचे सोशल मीडियावरील सादरीकरण प्रशिक्षणार्थींना खूपच भावले. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी काय काय आश्वासने दिली होती व नंतर ते त्यापासून कसे दूर गेले, हे सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना टाळ्यांची दाद मिळत गेली.- आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. त्यांना व धुळे जिल्ह्यातील शहीद शेतकरी धर्मा पाटील यांना यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.- शिबिराच्या शेवटी, अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते स्वागत करून पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या ५३ व बहुजन क्रांती दलाच्या १०४ कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. शहर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष बाबा तायडे व त्यांच्या सहका-यांनी हा प्रवेश घडवून आणला.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादAshok Chavanअशोक चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMohan Prakashमोहन प्रकाश