शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद कशासाठी हवी ? इतर पर्यायांचा व्हावा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:32 IST

बालवयातच जाती-पातीची, प्रवर्गाची भावना शाळेतील प्रवर्ग आणि जातीच्या उल्लेखाने रुजवण्यात भर पडते, ती योग्य नाही

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना ठेवावे जातीपासून दूर, तज्ज्ञांचा सूर

- योगेश पायघन

औरंगाबाद : शाळेच्या दाखल्यावर, पटावर जातीचा उल्लेख लहानग्यांच्या मनात जातीची भावना पेरण्यास मदत करते. जातीची नोंद ठेवायचीच असेल, तर त्यासाठी इतर अनेक पर्याय आहेत. शाळेच्या दाखल्यावरील जात हटवली जावी. केवळ कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातून जात हटावी, असा सूर सर्वच स्तरांतून निघत आहे.

बालवयातच जाती-पातीची, प्रवर्गाची भावना शाळेतील प्रवर्ग आणि जातीच्या उल्लेखाने रुजवण्यात भर पडते, ती योग्य नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शाळेच्या टीसीवर जात असली तरी जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र लागतेच. त्यासाठी निर्गम उतारा लागतोच. मग, शाळेच्या दाखल्यावर जात नसली, तरी काही अडचण येणार नाही. सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने प्रवर्ग बनवले गेले. प्रवर्गावर घटनात्मक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक न्यायाची जी प्रक्रिया सुरू आहे, ती अधिक न्यायसंगत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पुढे चालवली गेली पाहिजे. 

मुलांवर शाळेत जातपात बिंबवू नयेशाळेच्या दाखल्यावरून जात हटवायला पाहिजे. प्रवेश निर्गम उताऱ्यावर नोंद ठेवता येईल किंवा जातीच्या प्रमाणपत्रासाठी विशेष अभियान घ्यावे. केवळ शाळेच्या दाखल्यावर जात असली तरी जात प्रमाणपत्र आणि पडताळणी प्रमाणपत्र लागतेच. शाळेच्या दाखल्यावर किंवा शाळेत जात कळल्याने जातीची, प्रवर्गाची ओळख लहान मुलांवर शालेय जीवनात बिंबत जाते.-एस.पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

दृष्टिकोन बदलल्याचे जाणवतेजातीचा उल्लेख शाळेच्या दाखल्यावर किंवा शाळेच्या नेहमीच्या कामात येण्यामुळे मुलांमध्ये जातीसंबंधीच्या भाव भावना निर्माण होतात. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे अनेकदा जाणवते. त्यासाठी निर्गम उताऱ्यावर नोंदी, स्वतंत्र प्रमाणपत्र, असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे टीसीवरचा जातीचा उल्लेख हटवायला हवा.-शकिला न्हावकर, प्रभारी मुख्याध्यापक

भेदभाव अनुभवायला येतातशाळेचा दाखला जात कळण्याचे मुख्य माध्यम ठरते. जात कळाल्यावर जातीय मानसिकतेचे लोक त्याच भावनेने वागायला लागतात. सर्वच तसेच नसतात. मात्र, आपला व परका, हे भेद अनुभवायला येतात. हे बदल जात कळाल्यावर, वागणे बदल्यावर जाणवते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या कागदपत्रांतून दिसणारी जात हटवली जावी.-योगेश बहादुरे, संशोधक विद्यार्थी

...तर वास्तविक जीवनातूनही जात हटावीजात सर्वच ठिकाणांहून हटली पाहिजे. भारतातून कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातील जात हटण्याची नितांत गरज आहे. देशात वर्ण जातीव्यवस्थेचा तुरुंग आहे. हा तुरुंग उद्‌ध्वस्त झाला पाहिजे. आधुनिक भारताची भूमिका तशीच असली पाहिजे. त्यासाठी कागदोपत्री जातीपातीच्या नोंदी नष्ट केल्या पाहिजेत. वास्तवात राज्य यंत्रणेने त्यासाठी अग्रक्रमाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगारविषयक धोरणे निर्माण करून प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचवावी.-ॲड. विष्णू ढोबळे, अध्यक्ष, समाजवादी जनपरिषद, महाराष्ट्र

जातीव्यवस्थेचे विसर्जन व्हावेशाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असू नये. खरे पाहिले तर जातीव्यवस्थेचे विसर्जन झाले पाहिजे. जातीभेदाच्या विषाचा परिणाम कमी करायचा असेल, तर शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातूनच ते होऊ शकेल. दाखल्यावर व पटावर जातीचा उल्लेख टाळून त्याची सुरुवात होऊ शकते. सध्याच्या व्यवस्थेत जिथे अनिवार्य आहे तिथे जात प्रमाणपत्र वापरता येईल. दाखल्यावर जात येणे अनावश्यक आहे.-डाॅ. श्रीरंग देशपांडे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी