शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद कशासाठी हवी ? इतर पर्यायांचा व्हावा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:32 IST

बालवयातच जाती-पातीची, प्रवर्गाची भावना शाळेतील प्रवर्ग आणि जातीच्या उल्लेखाने रुजवण्यात भर पडते, ती योग्य नाही

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना ठेवावे जातीपासून दूर, तज्ज्ञांचा सूर

- योगेश पायघन

औरंगाबाद : शाळेच्या दाखल्यावर, पटावर जातीचा उल्लेख लहानग्यांच्या मनात जातीची भावना पेरण्यास मदत करते. जातीची नोंद ठेवायचीच असेल, तर त्यासाठी इतर अनेक पर्याय आहेत. शाळेच्या दाखल्यावरील जात हटवली जावी. केवळ कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातून जात हटावी, असा सूर सर्वच स्तरांतून निघत आहे.

बालवयातच जाती-पातीची, प्रवर्गाची भावना शाळेतील प्रवर्ग आणि जातीच्या उल्लेखाने रुजवण्यात भर पडते, ती योग्य नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शाळेच्या टीसीवर जात असली तरी जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र लागतेच. त्यासाठी निर्गम उतारा लागतोच. मग, शाळेच्या दाखल्यावर जात नसली, तरी काही अडचण येणार नाही. सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने प्रवर्ग बनवले गेले. प्रवर्गावर घटनात्मक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक न्यायाची जी प्रक्रिया सुरू आहे, ती अधिक न्यायसंगत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पुढे चालवली गेली पाहिजे. 

मुलांवर शाळेत जातपात बिंबवू नयेशाळेच्या दाखल्यावरून जात हटवायला पाहिजे. प्रवेश निर्गम उताऱ्यावर नोंद ठेवता येईल किंवा जातीच्या प्रमाणपत्रासाठी विशेष अभियान घ्यावे. केवळ शाळेच्या दाखल्यावर जात असली तरी जात प्रमाणपत्र आणि पडताळणी प्रमाणपत्र लागतेच. शाळेच्या दाखल्यावर किंवा शाळेत जात कळल्याने जातीची, प्रवर्गाची ओळख लहान मुलांवर शालेय जीवनात बिंबत जाते.-एस.पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

दृष्टिकोन बदलल्याचे जाणवतेजातीचा उल्लेख शाळेच्या दाखल्यावर किंवा शाळेच्या नेहमीच्या कामात येण्यामुळे मुलांमध्ये जातीसंबंधीच्या भाव भावना निर्माण होतात. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे अनेकदा जाणवते. त्यासाठी निर्गम उताऱ्यावर नोंदी, स्वतंत्र प्रमाणपत्र, असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे टीसीवरचा जातीचा उल्लेख हटवायला हवा.-शकिला न्हावकर, प्रभारी मुख्याध्यापक

भेदभाव अनुभवायला येतातशाळेचा दाखला जात कळण्याचे मुख्य माध्यम ठरते. जात कळाल्यावर जातीय मानसिकतेचे लोक त्याच भावनेने वागायला लागतात. सर्वच तसेच नसतात. मात्र, आपला व परका, हे भेद अनुभवायला येतात. हे बदल जात कळाल्यावर, वागणे बदल्यावर जाणवते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या कागदपत्रांतून दिसणारी जात हटवली जावी.-योगेश बहादुरे, संशोधक विद्यार्थी

...तर वास्तविक जीवनातूनही जात हटावीजात सर्वच ठिकाणांहून हटली पाहिजे. भारतातून कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातील जात हटण्याची नितांत गरज आहे. देशात वर्ण जातीव्यवस्थेचा तुरुंग आहे. हा तुरुंग उद्‌ध्वस्त झाला पाहिजे. आधुनिक भारताची भूमिका तशीच असली पाहिजे. त्यासाठी कागदोपत्री जातीपातीच्या नोंदी नष्ट केल्या पाहिजेत. वास्तवात राज्य यंत्रणेने त्यासाठी अग्रक्रमाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगारविषयक धोरणे निर्माण करून प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचवावी.-ॲड. विष्णू ढोबळे, अध्यक्ष, समाजवादी जनपरिषद, महाराष्ट्र

जातीव्यवस्थेचे विसर्जन व्हावेशाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असू नये. खरे पाहिले तर जातीव्यवस्थेचे विसर्जन झाले पाहिजे. जातीभेदाच्या विषाचा परिणाम कमी करायचा असेल, तर शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातूनच ते होऊ शकेल. दाखल्यावर व पटावर जातीचा उल्लेख टाळून त्याची सुरुवात होऊ शकते. सध्याच्या व्यवस्थेत जिथे अनिवार्य आहे तिथे जात प्रमाणपत्र वापरता येईल. दाखल्यावर जात येणे अनावश्यक आहे.-डाॅ. श्रीरंग देशपांडे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी