शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोण खरे ? कृषी विभाग म्हणतो, २८६४ तर महसूल विभागानुसार ३९९ हेक्टरचे गारपिटीने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:46 IST

कृषी आणि महसूलच्या गारपीट नुकसानीबाबत वेगवेगळ्या अहवालाने खळबळ

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : जिल्ह्यात २८ डिसेंबर रोजी पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रबी आणि खरीप पिके, फळबागांच्या नुकसानीबाबत कृषी विभाग आणि महसूल विभागाने तयार केलेल्या अहवालात मोठी तफावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

कृषी विभागाच्या अहवालानुसार: जिल्ह्यात २८६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ ३९९ हेक्टरवरील पिकांना गारपिटीमध्ये क्षती पोहोचल्याचे नमूद करण्यात आले. वेगवेगळ्या अहवालांपैकी कोणता अहवाल शासनाकडे पाठविला जाणार, याविषयी माहिती समजू शकली नाही.

हिवाळा सुरू झालेला असताना २८ रोजी हवामानात अचानक बदल झाला आणि जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अचानक झालेल्या या पावसामुळे पैठण तालुक्यातील २६ गावे, वैजापूर तालुक्यातील ४, तर गंगापूर तालुक्यातील ७ अशा एकूण ३७ गावांतील खरीपमधील कापूस, तूर, रबी कांदा, गहू, मका आणि मोसंबीसारख्या फळपिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी आणि महसूल विभागाकडून अहवाल मागविला होता.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार: महसूल विभागाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यात केवळ ३९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तर, कृषी विभागाच्या अहवालानुसार पैठण तालुक्यातील २६ गावांतील ३३१७४ शेतकऱ्यांच्या १७५६ हेक्टर जिरायती, तर ६६ हेक्टर बागायती आणि ५८ हेक्टरवरील फळपिके अशा एकूण १ हजार ८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. वैजापूर तालुक्यातील४ गावांतील ९७४ शेतकऱ्यांच्या ४३ हेक्टर जिरायती, ३४५हेक्टर बागायती, तर ११ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले.गंगापूर तालुक्यातील ७ गावांतील ७३० शेतकऱ्यांच्या १९६ हेक्टर जिरायती, ३८९ हेक्टर बागायती आणि ४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून याबाबतचा अहवाल २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.

कार्यालयात बसून अहवाल तयार केल्याची चर्चाकृषी विभाग आणि महसूल विभागाचे वेगवेगळे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. या दोन्ही अहवाल वाचल्यानंतर बाधित क्षेत्राची मोठी तफावत आहे. हे दोन्ही प्राथमिक अहवाल असले तरी दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांचा यात समन्वय नसल्याचे दिसून येते. हा अहवाल कार्यालयात बसून तयार केल्याचे बोलले जात आहे. या अहवालानुसार शासन नुकसानाचा अंदाज बांधून शेतकऱ्यांना भरपाई देईल, असे सूत्राने सांगितले.

टॅग्स :HailstormगारपीटAurangabadऔरंगाबादRainपाऊस