शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

कोण खरे ? कृषी विभाग म्हणतो, २८६४ तर महसूल विभागानुसार ३९९ हेक्टरचे गारपिटीने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:46 IST

कृषी आणि महसूलच्या गारपीट नुकसानीबाबत वेगवेगळ्या अहवालाने खळबळ

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : जिल्ह्यात २८ डिसेंबर रोजी पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रबी आणि खरीप पिके, फळबागांच्या नुकसानीबाबत कृषी विभाग आणि महसूल विभागाने तयार केलेल्या अहवालात मोठी तफावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

कृषी विभागाच्या अहवालानुसार: जिल्ह्यात २८६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ ३९९ हेक्टरवरील पिकांना गारपिटीमध्ये क्षती पोहोचल्याचे नमूद करण्यात आले. वेगवेगळ्या अहवालांपैकी कोणता अहवाल शासनाकडे पाठविला जाणार, याविषयी माहिती समजू शकली नाही.

हिवाळा सुरू झालेला असताना २८ रोजी हवामानात अचानक बदल झाला आणि जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अचानक झालेल्या या पावसामुळे पैठण तालुक्यातील २६ गावे, वैजापूर तालुक्यातील ४, तर गंगापूर तालुक्यातील ७ अशा एकूण ३७ गावांतील खरीपमधील कापूस, तूर, रबी कांदा, गहू, मका आणि मोसंबीसारख्या फळपिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी आणि महसूल विभागाकडून अहवाल मागविला होता.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार: महसूल विभागाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यात केवळ ३९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तर, कृषी विभागाच्या अहवालानुसार पैठण तालुक्यातील २६ गावांतील ३३१७४ शेतकऱ्यांच्या १७५६ हेक्टर जिरायती, तर ६६ हेक्टर बागायती आणि ५८ हेक्टरवरील फळपिके अशा एकूण १ हजार ८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. वैजापूर तालुक्यातील४ गावांतील ९७४ शेतकऱ्यांच्या ४३ हेक्टर जिरायती, ३४५हेक्टर बागायती, तर ११ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले.गंगापूर तालुक्यातील ७ गावांतील ७३० शेतकऱ्यांच्या १९६ हेक्टर जिरायती, ३८९ हेक्टर बागायती आणि ४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून याबाबतचा अहवाल २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.

कार्यालयात बसून अहवाल तयार केल्याची चर्चाकृषी विभाग आणि महसूल विभागाचे वेगवेगळे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. या दोन्ही अहवाल वाचल्यानंतर बाधित क्षेत्राची मोठी तफावत आहे. हे दोन्ही प्राथमिक अहवाल असले तरी दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांचा यात समन्वय नसल्याचे दिसून येते. हा अहवाल कार्यालयात बसून तयार केल्याचे बोलले जात आहे. या अहवालानुसार शासन नुकसानाचा अंदाज बांधून शेतकऱ्यांना भरपाई देईल, असे सूत्राने सांगितले.

टॅग्स :HailstormगारपीटAurangabadऔरंगाबादRainपाऊस