शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत कोण ? पोलिसांचे महापालिकेला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 7:07 PM

पोलिसांनी तपासाला वेग देत याविषयी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले.

ठळक मुद्देआरोपी बसचालकाची जामिनावर सुटकामुकुंदवाडी पोलिसांकडून तपास 

औरंगाबाद : पथदिव्यांच्या तुटलेल्या केबलमध्ये अडकून जालना रोडवर पडल्याने बसखाली चिरडून ललिता शंकर ढगे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी बसचालकांवर अटकेची कारवाई केल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी आता तुटलेल्या केबलकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याची तयारी सुरू केली. पोलिसांनी तपासाला वेग देत याविषयी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले.

 मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, जालना रोडवरील रामनगर येथे भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला पथदिव्याच्या तुटलेल्या केबलमध्ये अडकून पडताच मागून सुसाट आलेल्या बसखाली चिरडून ठार झाली होती. या भीषण दुर्घटनेनंतर त्याच दिवशी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळावरून बससह पसार झालेला बसचालक भारत वसंतराव निनगुरकरला पोलिसांनी २१ जानेवारी रोजी अटक केली. रस्त्यावर पडलेल्या पथदिव्यांच्या तुटलेल्या के बल वायरमध्ये अडकल्याने दुचाकीसह ललिता पडल्या होत्या. अनेक दिवसांपासून रस्त्यावर तुटलेली केबल वायर लोंबकळत होती. याकडे महापालिकेच्या विद्युत विभाग आणि संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले.

भूमिगत केबलचा दोष शोधून काढून पथदिव्यांना वीजपुरवठा करण्याऐवजी संबंधित कंत्राटदाराने थेट डी.पी.मधून वीज जोडणी घेतलेल्या वायर ओव्हरहेड पद्धतीने पथदिव्यांपर्यंत नेले होते. जालना रोडवरील विविध पथदिव्यांवर हे के बल वायर लोंबकळत होते. मात्र रात्रीतून ती केबल गायब करण्यात आली. मात्र पोलिसांनी  घटनास्थळी पडलेल्या त्या केबल वायरची छायाचित्रे काढली होती. रस्त्यावर केबल लोंबकळण्यास जबाबदार कोण, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने मुकुंदवाडी पोलिसांनी बुधवारी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून माहिती मागितली आहे. 

बसचालकाची जामिनावर सुटकाआरोपी बसचालक भारत निनगुरकरला पोलिसांनी जामिनावर सोडल्याचे समोर आले. महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानंतर तात्काळ पोलिसांसमोर हजर होण्याऐवजी भारत घटनास्थळावरून पसार झाला होता.

मनपावर गुन्हा दाखल कराललिता ढगे यांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या मनपाच्या ढिसाळ कारभाराविषयी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत कासलीवाल पूर्व येथील रहिवासी, तसेच युवा मंडळाने जालना रोडवरील त्या अपघातस्थळाजवळ मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली. ढगे यांच्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी अशी लक्षवेधी निदर्शने केली. 

पोलीस परवानगीशिवाय उचलले केबलआपल्या केबल वायरमुळे दुचाकीस्वार महिलेचा बळी गेल्याचे कळताच रात्रीतून गुपचूप केबल उचलून नेण्यात आली. विशेष म्हणजे मुकुंदवाडी पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करून ती केबल जप्त करायची होती. मात्र तत्पूर्वीच कातडी बचाव अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही केबल उचलण्यात आल्याचे दिसून येते.

मनपाकडून माहिती येताच संबंधितांवर कारवाईमहापालिक ा आयुक्तांना पत्र पाठवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या केबलची जबाबदारी कोणाची आहे, याविषयी माहिती मागितली आहे. ही माहिती मिळताच, याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.-उद्धव जाधव, पोलीस निरीक्षक, मुकुंदवाडी ठाणे

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका