शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कोणता झेंडा घेऊ हाती ! राज्यात ‘अनाकलनीय’ राजकारण; सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 15:15 IST

१७ सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, किरीट सोमय्या यांनी उडवून दिलेला आरोपांचा धुरळा, त्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील जाणवणारा विसंवाद यावरून संभ्रम वाढतो आहे.

- स.सो. खंडाळकरऔरंगाबाद : राज्यातील सध्याचे राजकारण गुंतागुंतीचे आणि अनाकलनीय असल्याची भावना वाढत असून, आगामी निवडणुकांपर्यंत युती व आघाड्यांची स्थिती नेमकी अशी असेल, याबाबत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ( Which flag to take! ‘Incomprehensible’ politics in the state; Activists of all parties in confusion ! ) 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakarey ) यांनी १७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर राज्य पातळीवर सुरू झालेल्या राजकीय घुसळणीनंतर ही संभ्रमावस्था आणखी वाढली. शिवसेना - भाजप ( Shiv Sena - BJP ) एकत्र येतात की काय, अशी चर्चा सुरू झाली. चिमटे काढणे, उपहास करणे आणि टोले लगावणे हा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव आहे व त्याला अनुसरूनच ते बोलले असावेत, असे काही जणांना वाटते. औरंगाबादेत वर्षानुवर्षे महापालिकेत शिवसेना व भाजपची सत्ता राहिली. शिवाय, मनपाची निवडणूक होऊ घातलेली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज असतात आणि ती डोळ्यासमोर ठेवून राजकीय गणिते मांडत असतात. शहरात एमआयएमचा ( AIMIM ) एक मोठा दबाव गट निर्माण झाल्याने राजकारणाचा रंग बदलतो आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी युतीच्या संकेताची गुगली टाकून पाहिली असावी, असे काही कार्यकर्त्यांना वाटत आहे.

१७ सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, किरीट सोमय्या यांनी उडवून दिलेला आरोपांचा धुरळा, त्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील जाणवणारा विसंवाद यावरून संभ्रम वाढतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनातही काहीतरी आहे, असे वाटू लागले आहे. सरकार पाडायचं आहे; पण त्याचं पाप आमच्या पदरात नको, अशी सावध भूमिका भाजपची दिसून येते. सध्याच्या राजकारणात कोण कुणावर दबाव वाढवतोय, मुख्यमंत्री कॉंग्रेस- राष्ट्रवादीवर दबाव वाढवू इच्छित आहेत, की भाजप-राष्ट्रवादीवर, आगामी सरकार शिवसेना - भाजपचे की राष्ट्रवादी कॉंग्रेस- भाजपचे, अशा खमंग चर्चांचे पेव फुटले आहेत. ईडी, सीबीआयचा भुंगा कधी कोणत्या नेत्याच्या मागे लागेल, याचा नेम राहिला नाही. या पार्श्वभूमीवर कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस