शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शेतकरी आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? मराठवाड्यात गेल्या वर्षात ९४८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:00 IST

९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले.

छत्रपती संभाजीनगर : गेले वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संपले. राजकीय पक्ष प्रचारात, तर प्रशासन आचारसंहिता अंमलबजावणीत गुंतलेले होते. परिणामी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष झाले. कापूस, सोयाबीनला कमी भावाच्या भोवती विधानसभा निवडणुकीचा प्रचार फिरला; परंतु शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी उपाय शोधण्याबाबत कुठल्याही पक्षाने जाहीर प्रचारातून एक शब्दही काढला नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत मराठवाड्यात ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक २०५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. ९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले. उर्वरित ३०३ प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मदतीसाठी पात्र ठरविलेल्या कुटुंबीयांना ३ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये मदतीचे वाटपही झाल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

दिवसाकाठी ३ आत्महत्यागेल्या वर्षात दिवसाकाठी २ ते ३ शेतकरी आत्महत्या झाल्याचे दिसते. कापूस, सोयाबीनला भाव नसणे, दुधाचे दर मागे-पुढे होणे, शेतीमध्ये शाश्वतता नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढला. मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणिते, अशा चक्रात शेतकरी आहे. या व इतर अनेक कारणांमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यामहिना..................आत्महत्याजानेवारी ६९फेब्रुवारी ७०मार्च ६७एप्रिल ५८मे ६२जून ९४जुलै ७७ऑगस्ट १००सप्टेंबर ८३ऑक्टोबर ७२नोव्हेंबर ७२डिसेंबर १०९एकूण ९४८

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर