शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शेतकरी आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? मराठवाड्यात गेल्या वर्षात ९४८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:00 IST

९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले.

छत्रपती संभाजीनगर : गेले वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संपले. राजकीय पक्ष प्रचारात, तर प्रशासन आचारसंहिता अंमलबजावणीत गुंतलेले होते. परिणामी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष झाले. कापूस, सोयाबीनला कमी भावाच्या भोवती विधानसभा निवडणुकीचा प्रचार फिरला; परंतु शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी उपाय शोधण्याबाबत कुठल्याही पक्षाने जाहीर प्रचारातून एक शब्दही काढला नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत मराठवाड्यात ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक २०५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. ९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले. उर्वरित ३०३ प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मदतीसाठी पात्र ठरविलेल्या कुटुंबीयांना ३ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये मदतीचे वाटपही झाल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

दिवसाकाठी ३ आत्महत्यागेल्या वर्षात दिवसाकाठी २ ते ३ शेतकरी आत्महत्या झाल्याचे दिसते. कापूस, सोयाबीनला भाव नसणे, दुधाचे दर मागे-पुढे होणे, शेतीमध्ये शाश्वतता नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढला. मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणिते, अशा चक्रात शेतकरी आहे. या व इतर अनेक कारणांमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यामहिना..................आत्महत्याजानेवारी ६९फेब्रुवारी ७०मार्च ६७एप्रिल ५८मे ६२जून ९४जुलै ७७ऑगस्ट १००सप्टेंबर ८३ऑक्टोबर ७२नोव्हेंबर ७२डिसेंबर १०९एकूण ९४८

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर