शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

शेतकरी आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? मराठवाड्यात गेल्या वर्षात ९४८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:00 IST

९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले.

छत्रपती संभाजीनगर : गेले वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संपले. राजकीय पक्ष प्रचारात, तर प्रशासन आचारसंहिता अंमलबजावणीत गुंतलेले होते. परिणामी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष झाले. कापूस, सोयाबीनला कमी भावाच्या भोवती विधानसभा निवडणुकीचा प्रचार फिरला; परंतु शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी उपाय शोधण्याबाबत कुठल्याही पक्षाने जाहीर प्रचारातून एक शब्दही काढला नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत मराठवाड्यात ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक २०५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. ९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले. उर्वरित ३०३ प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मदतीसाठी पात्र ठरविलेल्या कुटुंबीयांना ३ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये मदतीचे वाटपही झाल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

दिवसाकाठी ३ आत्महत्यागेल्या वर्षात दिवसाकाठी २ ते ३ शेतकरी आत्महत्या झाल्याचे दिसते. कापूस, सोयाबीनला भाव नसणे, दुधाचे दर मागे-पुढे होणे, शेतीमध्ये शाश्वतता नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढला. मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणिते, अशा चक्रात शेतकरी आहे. या व इतर अनेक कारणांमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यामहिना..................आत्महत्याजानेवारी ६९फेब्रुवारी ७०मार्च ६७एप्रिल ५८मे ६२जून ९४जुलै ७७ऑगस्ट १००सप्टेंबर ८३ऑक्टोबर ७२नोव्हेंबर ७२डिसेंबर १०९एकूण ९४८

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर