शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

"पटोले भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा"; चव्हाणांचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:47 IST

काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडणुकांबाबत चुकीचे विधान करतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. त्यांना वाचायची सवयच नसल्यामुळे असं होत आहे. : अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सूज आली असून ती लवकरच उतरेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कायद्याचे ज्ञानच नाही. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडणुकांबाबत चुकीचे विधान करतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. त्यांना वाचायची सवयच नसल्यामुळे असं होत आहे. पटोले यांना आठवण करून द्यायची आहे की, ते जेव्हा भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा. माझ्या भाजपात जाण्याबाबत टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा जोरदार पलटवार भाजपाचे राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. ते मंगळवारी आयएमए हाॅल येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

महायुतीचे सरकार पुन्हा आले तरच लाडकी बहीण योजनेसह इतर योजना टिकतील. असा प्रसार भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन करावा. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू करण्यासह दिलेल्या विविध लाभांची उजळणी देखील जनतेत जाऊन करावी,असे आवाहन चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. विरोधकांना योजना यशस्वी होतील यांची भीती वाटते आहे. त्यामुळे ते काहीही बिनबुडाचे आरोप करीत आहेत. भाजपा, शिंदेसेना, पवार गट आम्ही तिघे एकत्र असून तिघांनी योजनांचे श्रेय घेणे काही चुकीचे नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरचिटणीस दीपक ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. खा. डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, लक्ष्मीकांत थेटे, भगवान घडमोडे, अनिल मकरिये, एजाज देशमुख, जालिंदर शेंडगे, रामेश्वर भादवे, मनीषा मुंडे आदींची उपस्थिती होती.

मराठा समाजापर्यंत जाण्यास कमी पडलो....शासनाने मराठा आरक्षणासाठी काय केले, हे सांगण्यात कमी पडलो. १० टक्के आरक्षण मिळाले. उच्चशिक्षणासाठी त्याचा लाभ सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे कुणबी रेकॉर्ड आहे. त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत. मनोज जरांगे यांना मी चार वेळा भेटलो. त्यांचे काही विषय असतील त्यावर चर्चा करण्यासाठी शासन तयार आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत मराठा आरक्षण प्रकरण शांत होईल काय, ते काही सांगता येत नाही.

खा. राऊत म्हणजे तात्पुरती करमणूक...खा. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या टीकेवरून चव्हाण म्हणाले, देशात आणि राज्यात सक्षम नेतृत्व कोणाचे आहे, हे लोकांना माहिती आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे तात्पुरती करमणूक होते. मात्र, त्यामुळे त्यांना मतं मिळणार नाहीत.

लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही..लोकसभेची परिस्थिती वेगळी होती तीच परिस्थिती विधानसभेला राहील अशी शक्यता नाही. पुन्हा लॉटरी लागेल अशी अपेक्षा पटोले यांना असेल. देशात तिसऱ्यांदा मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही. मराठवाड्यात भाजपाला किती जागा वाट्याला येतील, यावर मी काहीही चर्चा केलेली नाही. शिंदेसेना, पवार गट आणि भाजप नेत्यात चर्चा होऊन जागावाटप निर्णय होईल. मतदारसंघातील प्राबल्याचा विचार होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshok Chavanअशोक चव्हाणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा