शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

"पटोले भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा"; चव्हाणांचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:47 IST

काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडणुकांबाबत चुकीचे विधान करतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. त्यांना वाचायची सवयच नसल्यामुळे असं होत आहे. : अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सूज आली असून ती लवकरच उतरेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कायद्याचे ज्ञानच नाही. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडणुकांबाबत चुकीचे विधान करतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. त्यांना वाचायची सवयच नसल्यामुळे असं होत आहे. पटोले यांना आठवण करून द्यायची आहे की, ते जेव्हा भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा. माझ्या भाजपात जाण्याबाबत टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा जोरदार पलटवार भाजपाचे राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. ते मंगळवारी आयएमए हाॅल येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

महायुतीचे सरकार पुन्हा आले तरच लाडकी बहीण योजनेसह इतर योजना टिकतील. असा प्रसार भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन करावा. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू करण्यासह दिलेल्या विविध लाभांची उजळणी देखील जनतेत जाऊन करावी,असे आवाहन चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. विरोधकांना योजना यशस्वी होतील यांची भीती वाटते आहे. त्यामुळे ते काहीही बिनबुडाचे आरोप करीत आहेत. भाजपा, शिंदेसेना, पवार गट आम्ही तिघे एकत्र असून तिघांनी योजनांचे श्रेय घेणे काही चुकीचे नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरचिटणीस दीपक ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. खा. डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, लक्ष्मीकांत थेटे, भगवान घडमोडे, अनिल मकरिये, एजाज देशमुख, जालिंदर शेंडगे, रामेश्वर भादवे, मनीषा मुंडे आदींची उपस्थिती होती.

मराठा समाजापर्यंत जाण्यास कमी पडलो....शासनाने मराठा आरक्षणासाठी काय केले, हे सांगण्यात कमी पडलो. १० टक्के आरक्षण मिळाले. उच्चशिक्षणासाठी त्याचा लाभ सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे कुणबी रेकॉर्ड आहे. त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत. मनोज जरांगे यांना मी चार वेळा भेटलो. त्यांचे काही विषय असतील त्यावर चर्चा करण्यासाठी शासन तयार आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत मराठा आरक्षण प्रकरण शांत होईल काय, ते काही सांगता येत नाही.

खा. राऊत म्हणजे तात्पुरती करमणूक...खा. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या टीकेवरून चव्हाण म्हणाले, देशात आणि राज्यात सक्षम नेतृत्व कोणाचे आहे, हे लोकांना माहिती आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे तात्पुरती करमणूक होते. मात्र, त्यामुळे त्यांना मतं मिळणार नाहीत.

लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही..लोकसभेची परिस्थिती वेगळी होती तीच परिस्थिती विधानसभेला राहील अशी शक्यता नाही. पुन्हा लॉटरी लागेल अशी अपेक्षा पटोले यांना असेल. देशात तिसऱ्यांदा मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही. मराठवाड्यात भाजपाला किती जागा वाट्याला येतील, यावर मी काहीही चर्चा केलेली नाही. शिंदेसेना, पवार गट आणि भाजप नेत्यात चर्चा होऊन जागावाटप निर्णय होईल. मतदारसंघातील प्राबल्याचा विचार होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshok Chavanअशोक चव्हाणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा