शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

पाणीपट्टी एक वर्षाची; पाणी ७ दिवसांआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 1:11 PM

नियोजनात पालिका कमी पडते आहे, असे सध्या तरी चित्र आहे.

ठळक मुद्देमराठवाडा विकास मंडळ तज्ज्ञांचा मनपाला प्रस्तावसमन्यायी पाणी वाटपाची मागणी

औरंगाबाद : शहरातील नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी घ्यायची आणि ७ दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठाकरायचा, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यासारखे आहे. समन्यायी पाणी वाटप व्हावे या हेतूने मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी महापालिका प्रशासनाला सूचना करणारा एक प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावानुसार प्रशासनाने बदल केले, तर नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल. 

सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू आहे. आंदोलने, ठिय्या देणे, अभियंत्यांना मारहाण करणे, अशा घटना सध्या घडत आहेत; परंतु पालिकेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात कोणतेही यश येत नाही. गुंठेवारी वसाहतींमधून पिण्याच्या पाण्यासाठी ओरड होत आहे, अशा परिस्थितीत विकास मंडळ सदस्य नागरे यांनी मनपा आयुक्तांना प्रस्ताव देऊन काही उपाय सुचविले आहेत.

शहरातील एकूण किती ईएसआरमधून नागरिकांना पाणीवाटप होते त्यांची संख्या पाहा. प्रत्येक ईएसआरखाली किती लोकसंख्या येते याची माहिती घ्या. प्रत्येक ईएसआरमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीसाठा करण्याची तरतूद करा. जसे की, ३ लाख लोकसंख्या असलेल्या ईएसआरमध्ये ३० एमएलडी पाणीसाठा करावा. शहरातील ८ लाख लोकसंख्या (५० टक्के) असलेल्या ईएसआरमध्ये पहिल्या दिवशी ८० एमएलडी पाणी साठवून ते नागरिकांना १ दिवसात पुरविले जावे. शहरात पैठण धरणावरून मिळणाऱ्या १२० एमएलडी पाण्यापैकी ८० एमएलडी पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरणे शक्य आहे. उरलेले ४० एमएलडी पाणी हॉटेल, उद्योग, कारखाने व अग्निशमन आणि इतर उपयोगासाठी ठेवता येईल. या पद्धतीने २ दिवसांत पूर्ण शहराला पिण्याचे पाणी पुरविणे शक्य होऊ शकेल. तसेच व्यावसायिक आणि इतर वापरासाठी देखील याच रोटेशनने पाणी देता येईल. २ दिवसांत २४० एमएलडी पाणी पालिका जायकवाडीतून शहरात आणते. त्यामुळे त्याचे वितरण साठवण करून केले जावे, अशा पद्धतीने पाणी वाटप केले गेल्यास शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल. कारण १६ लाख शहराची लोकसंख्या असून, त्या लोकसंख्येला २४० एमएलडी पाणी सहज पुरविणे शक्य होईल. 

जनतेला वेठीस धरू नकानियोजनात पालिका कमी पडते आहे, असे सध्या तरी चित्र आहे. पाणी वाटप करण्यात अडचणी येत असल्यास चर्चा करून यावर मार्ग काढता येईल; परंतु पिण्याच्या पाण्यासाठी ७ दिवसांपर्यंत जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. वर्षभराची पाणीपट्टी घ्यायची आणि पाणी असताना फक्त ४८ दिवस पाणीपुरवठा करायचा, हे धोरण चुकीचे असल्याचे नागरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :TaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी