शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसाठा घटला

By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST

परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. केवळ १९ टक्के पाणी शिल्लक असून, आगामी काळात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. केवळ १९ टक्के पाणी शिल्लक असून, आगामी काळात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे जिल्हावासियांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
यावर्षी सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी अजूनही पावसाला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. गतवर्षी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले होते. या प्रकल्पातील पाणी आतापर्यंत पुरले. परंतु यापुढे मात्र परिस्थिती गंभीर होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात येलदरी हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्याखालोखाल सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता आहे. जिंतूर तालुक्यात करपरा आणि गंगाखेड तालुक्यात मासोळी हे दोन मध्य प्रकल्प असून, २२ लघू प्रकल्प आहेत. येलदरी धरणात ३९.६० टक्के पाणी आहे तर ुलोअर दुधना प्रकल्पात ३२ टक्के पाणी शिल्लक आहे. करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ३.८३० दलघमी (१५ टक्के) तर मासोळी मध्यम प्रकल्पात ८.१९४ दलघमी (३० टक्के ) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर लघू प्रकल्पांमध्ये ५.६०९ दलघमी म्हणजे १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
मोठ्या प्रकल्पांबरोबरच मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील पाणी सिंचनाबरोबरच पिण्यासाठी देखील वापरले जाते. या प्रकल्पांवर अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. दिवसेंदिवस पाणीसाठ्यात घट होत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर असून, पाणीटंचाई उग्र होत आहे.
यावर्षी अजूनही पावसाला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. एकही मोठा पाऊस अद्याप झालेला नाही. पाऊस पडावा म्हणून देवाकडे साकडे घातले जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा लक्षात घेता आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
येलदरीत ४०, लोअर दुधनात ३२ टक्के
यावर्षी येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३९ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३०१ मि.मी. पाऊस झाला होता. पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात घट झाली. सध्या ३२०.५१३ दलघमी (३९.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा या धरणात उपलब्ध आहे. तर लोअर दुधना धरणामध्ये एकूण ५२ टक्के पाणीसाठा असून, त्यापैकी ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.