शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आठवड्यातून एकदा पाणी, ते सुद्धा वेळेवर नाही; छत्रपती संभाजीनगरात नागरिक प्रचंड त्रस्त

By मुजीब देवणीकर | Updated: December 1, 2023 18:56 IST

पाणीपुरवठ्याची अत्यंत बिकट, कालबाह्य यंत्रणा असतानाही आम्ही पाणी देतोय, असा प्रशासनाचा तोरा आहे.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी देत आहे. त्यातही पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नाही. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी पाणी येते. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना पाण्याच्या दिवशी इतर कामे बाजूला ठेवावी लागतात. पाण्यासाठी अनेकदा लग्न कार्य, दु:ख प्रसंगातही कुठे ये-जा करता येत नाही. नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाशी प्रशासनाला काहीच देणेघेणे नाही. उलट पाणीपुरवठ्याची अत्यंत बिकट, कालबाह्य यंत्रणा असतानाही आम्ही पाणी देतोय, असा प्रशासनाचा तोरा आहे.

शहराला सध्या २२० एमएलडी पाण्याची दररोज गरज आहे. महापालिका जायकवाडीतून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात आणते. कागदावर येणारे पाणी आणि शहराची मागणी याची गोळाबेरीज केली तर मोठी तफावत दिसते. अनेक तज्ज्ञांनी यावर काथ्याकूट केला. मात्र, प्रशासन नियोजनात आम्ही कमी पडतोय, हे मान्य करीत नाही. त्यामुळे शहरातील ८० टक्के वसाहतींना ७ व्या दिवशी उर्वरित वसाहतींना ८ व्या आणि ९ व्या दिवशी पाणी मिळते. ‘लोकमत’ने शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांकडे पाणी कितव्या दिवशी येते, याची विचारणा केली. बहुतांश नागरिकांचे आठवड्यातून एकदाच, असे उत्तर होते.

३६५ पैकी ४८ दिवस पाणीवर्षातून फक्त ४८ दिवस महापालिका नागरिकांना पाणी देते. कोणत्या वसाहतीला किती वेळ पाणी द्यायचे हे कागदावर लिहिलेले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळीच असते. कोणाला ४ तास तर कोणाला ८ तास पाणी देण्यात येते. या वसाहती कोणत्या, हे पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.

म्हणून पाणीपट्टी भरेनातपूर्वी पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये होती. दोन वर्षांपूर्वी पाणीपट्टी २ हजार ५० रुपये करण्यात आली. त्यानंतरही नागरिक पाणीपट्टीच भरत नाहीत. दरवर्षी पाणीपुरवठ्यावर मनपाला १२० ते १३० कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्या तुलनेत पाणीपट्टी २० कोटीही वसूल होत नाही.

अनेक वॉर्डात राजकारण वेगळेचकाही माजी नगरसेवक वॉर्डातील नागरिकांना दुपारी ३ वाजता पाणी येणार असा मेसेज मोबाईलवर पाठवतात. पण पाणी लवकर किंवा उशिरा येते. कारण माजी नगरसेवकाचे विरोधक मेसेजला खोडून काढण्यासाठी लाइनमनला हाताशी धरतात. याचा त्रास सर्वसामान्यांना होतोय, याची जाणीव कोणालाच नाही.

नागरिकांची मोजणीच चुकीचीज्या दिवशी पाणीपुरवठा होतोय, तो दिवस मोजायचा नाही. त्यानंतर पाच दिवस, सहा दिवस गॅप असतो. शहरात सध्या चार आणि पाच दिवसांआड पाणी देतोय. उलट काही भागात एक दिवस आणखी कमी केला. वेळेचेही काटेकोर पालन करतोय. तांत्रिक बिघाड, अडचण निर्माण झाली तरच वेळ मागेपुढे होतो.- के. ए. फालक, कार्यकारी अभियंता, मनपा.

कोणत्या भागात पाणी कधी?वसाहत-------कितव्या दिवशीएन-२ सिडको- ६ईटखेडा-नक्षत्रवाडी-७रामनगर-मुकुंदवाडी-८हडको एन- ११ परिसर - ७गारखेडा-शिवाजीनगर-७दिवाणदेवडी-शहागंज-७ब्रिजवाडी-नारेगाव- ८सिडको एन-८ परिसर --७गणेश कॉलनी-रशीदपुरा ९भडकलगेट-टाऊन हॉल- ६सिडको एन-६ परिसर --६गुलमंडी-धावणी मोहल्ला-८आकाशवाणी-त्रिमूर्ती चौक-७किराडपुरा-रहेमानिया कॉलनी- ९बारी कॉलनी परिसर- ८भवानीनगर- मोंढा- ८भीमनगर-भावसिंगपुरा-७आरेफ कॉलनी- ८

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी