शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एकीकडे पाण्याची मारामार; दुसरीकडे योजनांचा भडिमार; जायकवाडी धरणावरच आहे भिस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:30 IST

१२ वर्षांत केवळ ४ वेळाच भरले जायकवाडी धरण, २०५० सालापर्यंतच्या लोकसंख्येसह उद्योगांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन यावरच

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी धरणावरच २०५० सालापर्यंतच्या लोकसंख्येसह उद्योगांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. मागील १२ वर्षांचा धरणाचा आढावा घेतला तर फक्त चार वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले, सात वेळा धरण मृतसाठ्यात गेले, तर एका वर्षी ९० टक्क्यांपर्यंत धरणात पाणी होते. जायकवाडीची अशी परिस्थिती समोर असताना नवीन पाणीपुरवठा योजनांचा भडिमार केला जात आहे.

महापालिका व झालर क्षेत्रासाठी जलवाहिन्यांचे नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे वाळूज परिसर, शेंद्रा व डीएमआयसीची भविष्यातील गरज समोर ठेवूनही नियोजन केले जात आहे. या सगळ्या पाणीपुरवठा योजनांसाठी जायकवाडीच केंद्रस्थानी असणार आहे.मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. परळीचे वीजनिर्मिती करणारे औष्णिक वीज केंद्रसुद्धा याच पाण्यावर अवलंबून आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल २०८ कि.मी. आहे. जायकवाडीतून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सुटते. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. ४०० गावांची तहानही जायकवाडीच भागवते. औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, (डीएमआयसी) चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत.

जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील गावांसह औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. उद्योगांना रोज ५२ ते ६० एमएलडी पाणीउपसा होतो. म्हणजेच औरंगाबादला रोज २ ते ३ द.ल.घ.मी. पाणी लागते. मृत जलसाठ्यातून पाणीउपसा सुरू केल्यानंतर साधारणत: दीड वर्ष पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द.ल.घ.मी. आहे. २५० दलघमी पाणी मृतसाठ्यातून मिळते. जायकवाडीत सध्या ३२ टक्के पाणीसाठा आहे.

१०.२० टीएमसी पाणी आरक्षितलाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत फेब्रुवारी २०२१ मध्ये सांगितल्यानुसार जायकवाडीत ७.५५ टीएमसी गाळ आहे. सुमारे ९.६७ टीएमसी बाष्पीभवन होते. माजलगाव धरणाला ४.०६, औरंगाबाद पालिकेला १.५५, जालना शहराला ०.२६, २५० गावांना ०.५१ टीएमसी, गेवराई शहराला १.८३, सर्व एमआयडीसी ०.५७ टीएमसी, परळी औष्णिक १.४१ तर आकस्मिक पिण्याच्या आरक्षणासाठी ४.०६ असे १०.२० टीएमसी पाणी आरक्षित आहे.

शहरासाठी अशा योजना, असा उपसाऔरंगाबाद शहर सध्या : १३० ते १४० एमएलडी दररोज उपसाएमआयडीसी : ५६ एमएलडी दररोज उपसाएमआयडीसी, जालना, डीएमआयसी संयुक्त : ७२ एमएलडी (२० एमएलडी डीएमआयसी)

प्रस्तावित योजनानवीन पाणीपुरवठा योजना : ६०५ एमएलडीझालर प्रस्तावित योजना : १२२ एमएलडी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण