शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे पाण्याची मारामार; दुसरीकडे योजनांचा भडिमार; जायकवाडी धरणावरच आहे भिस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:30 IST

१२ वर्षांत केवळ ४ वेळाच भरले जायकवाडी धरण, २०५० सालापर्यंतच्या लोकसंख्येसह उद्योगांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन यावरच

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी धरणावरच २०५० सालापर्यंतच्या लोकसंख्येसह उद्योगांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. मागील १२ वर्षांचा धरणाचा आढावा घेतला तर फक्त चार वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले, सात वेळा धरण मृतसाठ्यात गेले, तर एका वर्षी ९० टक्क्यांपर्यंत धरणात पाणी होते. जायकवाडीची अशी परिस्थिती समोर असताना नवीन पाणीपुरवठा योजनांचा भडिमार केला जात आहे.

महापालिका व झालर क्षेत्रासाठी जलवाहिन्यांचे नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे वाळूज परिसर, शेंद्रा व डीएमआयसीची भविष्यातील गरज समोर ठेवूनही नियोजन केले जात आहे. या सगळ्या पाणीपुरवठा योजनांसाठी जायकवाडीच केंद्रस्थानी असणार आहे.मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. परळीचे वीजनिर्मिती करणारे औष्णिक वीज केंद्रसुद्धा याच पाण्यावर अवलंबून आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल २०८ कि.मी. आहे. जायकवाडीतून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सुटते. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. ४०० गावांची तहानही जायकवाडीच भागवते. औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, (डीएमआयसी) चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत.

जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील गावांसह औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. उद्योगांना रोज ५२ ते ६० एमएलडी पाणीउपसा होतो. म्हणजेच औरंगाबादला रोज २ ते ३ द.ल.घ.मी. पाणी लागते. मृत जलसाठ्यातून पाणीउपसा सुरू केल्यानंतर साधारणत: दीड वर्ष पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द.ल.घ.मी. आहे. २५० दलघमी पाणी मृतसाठ्यातून मिळते. जायकवाडीत सध्या ३२ टक्के पाणीसाठा आहे.

१०.२० टीएमसी पाणी आरक्षितलाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत फेब्रुवारी २०२१ मध्ये सांगितल्यानुसार जायकवाडीत ७.५५ टीएमसी गाळ आहे. सुमारे ९.६७ टीएमसी बाष्पीभवन होते. माजलगाव धरणाला ४.०६, औरंगाबाद पालिकेला १.५५, जालना शहराला ०.२६, २५० गावांना ०.५१ टीएमसी, गेवराई शहराला १.८३, सर्व एमआयडीसी ०.५७ टीएमसी, परळी औष्णिक १.४१ तर आकस्मिक पिण्याच्या आरक्षणासाठी ४.०६ असे १०.२० टीएमसी पाणी आरक्षित आहे.

शहरासाठी अशा योजना, असा उपसाऔरंगाबाद शहर सध्या : १३० ते १४० एमएलडी दररोज उपसाएमआयडीसी : ५६ एमएलडी दररोज उपसाएमआयडीसी, जालना, डीएमआयसी संयुक्त : ७२ एमएलडी (२० एमएलडी डीएमआयसी)

प्रस्तावित योजनानवीन पाणीपुरवठा योजना : ६०५ एमएलडीझालर प्रस्तावित योजना : १२२ एमएलडी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण