शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 15:02 IST

टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. बहुतांश तालुक्यांत समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी टँकरने पुरवठा करावा लागणार आहे. 

पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात २५ टक्क्यांपेक्षा पुढे पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. जून मध्यापर्यंत ६०० च्या आसपास टँकर सुरू होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात जवळपास १९६ गावे आणि ७२ वाड्यांत पाणीटंचाई असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. यात गंगापूर १११, पैठण ४६, सिल्लोड ६२, फु लंब्री २०,  वैजापूर ३ टँकर, असे एकूण २४२ टँकर सुरू आहेत. 

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन व परिसरात पाण्यासाठी भयावह परिस्थिती आहे. ग्रामस्थांना पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी पत्र्यांच्या पन्हाळाखाली ड्रम भरून ठेवावे लागत आहेत. अशातच टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार ३० जूनपर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो, त्यानंतर टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्याकरिता जुलै महिन्याचे काही दिवस टँकर सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

शासनाकडे पाठविला प्रस्ताव जिल्ह्यात टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील किती गावांना टँकरची गरज आहे, त्याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत.जून महिन्यापर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो; मात्र यंदाच्या जून महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्यामुळे जुलै महिन्यातील काही दिवस गरजेप्रमाणे टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद