शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 15:02 IST

टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. बहुतांश तालुक्यांत समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी टँकरने पुरवठा करावा लागणार आहे. 

पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात २५ टक्क्यांपेक्षा पुढे पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. जून मध्यापर्यंत ६०० च्या आसपास टँकर सुरू होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात जवळपास १९६ गावे आणि ७२ वाड्यांत पाणीटंचाई असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. यात गंगापूर १११, पैठण ४६, सिल्लोड ६२, फु लंब्री २०,  वैजापूर ३ टँकर, असे एकूण २४२ टँकर सुरू आहेत. 

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन व परिसरात पाण्यासाठी भयावह परिस्थिती आहे. ग्रामस्थांना पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी पत्र्यांच्या पन्हाळाखाली ड्रम भरून ठेवावे लागत आहेत. अशातच टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार ३० जूनपर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो, त्यानंतर टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्याकरिता जुलै महिन्याचे काही दिवस टँकर सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

शासनाकडे पाठविला प्रस्ताव जिल्ह्यात टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील किती गावांना टँकरची गरज आहे, त्याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत.जून महिन्यापर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो; मात्र यंदाच्या जून महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्यामुळे जुलै महिन्यातील काही दिवस गरजेप्रमाणे टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद