शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 15:02 IST

टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. बहुतांश तालुक्यांत समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी टँकरने पुरवठा करावा लागणार आहे. 

पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात २५ टक्क्यांपेक्षा पुढे पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. जून मध्यापर्यंत ६०० च्या आसपास टँकर सुरू होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात जवळपास १९६ गावे आणि ७२ वाड्यांत पाणीटंचाई असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. यात गंगापूर १११, पैठण ४६, सिल्लोड ६२, फु लंब्री २०,  वैजापूर ३ टँकर, असे एकूण २४२ टँकर सुरू आहेत. 

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन व परिसरात पाण्यासाठी भयावह परिस्थिती आहे. ग्रामस्थांना पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी पत्र्यांच्या पन्हाळाखाली ड्रम भरून ठेवावे लागत आहेत. अशातच टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार ३० जूनपर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो, त्यानंतर टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्याकरिता जुलै महिन्याचे काही दिवस टँकर सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

शासनाकडे पाठविला प्रस्ताव जिल्ह्यात टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील किती गावांना टँकरची गरज आहे, त्याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत.जून महिन्यापर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो; मात्र यंदाच्या जून महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्यामुळे जुलै महिन्यातील काही दिवस गरजेप्रमाणे टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद