शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याला नगरमध्येच फुटल्या अनेक वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 2:15 PM

निळवंडेतून पाणी सोडल्याच्या तिसऱ्या दिवशीही पाणी नेवाशापर्यंत पोहोचलेले नव्हते. 

ठळक मुद्देजायकवाडीच्या पाण्याची सुरु आहे पळवापळवी निळवंडेतून तीन दिवसापूर्वी सुटलेले पाणी नेवाशातही पोचले नाही

औरंगाबाद :  न्यायालयाच्या आदेशानंतर वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्यात येत आहे; मात्र अहमदनगर जिल्ह्यात कालव्याद्वारे पाण्याला दुसरीकडे वळविण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडेतून पाणी सोडल्याच्या तिसऱ्या दिवशीही पाणी नेवाशापर्यंत पोहोचलेले नव्हते. 

कालव्याद्वारे पाणी वळविण्यासह बंधाऱ्यातही अडविले जात आहे. कमीत कमी पाणी पुढे जावे यासाठी मध्ये इतक्या ‘वाटा’ निर्माण करून ठेवल्या आहेत की, जायकवाडीत पाणी किती येईल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. भंडारदऱ्यातून १ हजार ५४७ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडण्यात आले होते, तर निळवंडेतून बुधवारी २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही निळवंडेतून २ हजार क्युसेक विसर्ग सुरूच होता; पण कालव्यातून पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याने पाणी पुढे सरकत नव्हते.

ओझर बंधाऱ्यातून गुरुवारी पाण्याचा विसर्ग वाढून १४७६ क्युसेक करण्यात आला होता; मात्र शुक्रवारी पुन्हा ७६ क्युसेकने पाणी कमी सोडण्यात आले. त्यामुळे दिवसभरात केवळ १४०० क्युसेक विसर्ग करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, कालवा गुरुवारी रात्री बंद करण्यात येईल व शुक्रवारी नेवासा येथे पाणी पोहोचेल; पण प्रत्यक्षात शुक्रवारी डावा कालवा बंद करण्यात आला नाही. आजही डाव्या कालव्यातून पाणी वाहतच राहिले. ओझर बंधाऱ्यातून सोडण्यात येणारे पाणी खालील बंधाऱ्यांत अडविण्यात येत होते.  कालव्यात सोडलेल्या पाण्यासह ठिकठिकाणी पाण्याच्या चोरीची शक्यताही आहेच. यामुळे प्रत्यक्षात जायकवाडीला किती पाणी येते, हे निश्चित सांगणे कठीण आहे.

‘थर्ड पार्टी आॅडिट’ची मागणीन्यायालयाचे आदेश असतानाही जायकवाडीच्या हक्काचे पाणी ठरवून दिलेल्या प्रमाणात पोहोचत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आता वरच्या धरणांतून सोडलेल्या पाण्याचे व प्रत्यक्षात जायकवाडीत आलेल्या पाण्याचे थर्ड पार्टी आॅडिट करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAhmednagarअहमदनगरNashikनाशिक