शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

मराठवाड्यातील १४५ मंडळात पाणीच पाणी; आठ दिवसांत ३१ जणांचा बळी, ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:44 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली.

ठळक मुद्देविभागात सरासरीपेक्षा ११९ मि.मी. पाऊस जास्तसलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी३ लाख हेक्टरच्या आसपास पिकांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हाहाकार उडवून दिला. वार्षिक सरासरीपेक्षा ११९ मि.मी. पाऊस जास्त नोंदविला गेला आहे. ६७९ मि.मी.च्या तुलनेत ७९८ मि.मी. पाऊस विभागात आजवर झाला. ८ सप्टेंबर रोजी १४५ मंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली. ३ लाख हेक्टरच्या आसपास पिकांचे नुकसान झाल्याची नोंद विभागीय प्रशासनाने घेतली आहे.

आठ दिवसांत ३१ जणांचा बळी : ५ जणांचा शोधऔरंगाबाद ४, जालना ४, परभणी २, हिंगोली ४, नांदेड ७, बीड ५, लातूर ३, उस्मानाबाद २ अशा ३१ जणांचा बळी आठ दिवसांत पावसाने घेतला आहे. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसात वाहून गेलेल्या ५ जणांचा शोध सुरू आहे. २३ लहान-मोठी जनावरे पावसाने वाहून गेली. २३ ठिकाणी घरे पडली.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. ४४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सुमारे १ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामाच्या नुकसानाची प्राथमिक नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. अनेक ठिकाणी पाहणी, पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवसात ८० मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस म्हणून नोंदला गेला. ५८१ मि.मी.च्या तुलनेत ६९६ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. ११९ टक्के हे प्रमाण आहे. कन्नड तालुक्यातील २ लघुतलाव फुटले असून त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

जिल्हानिहाय पावसाचा तडाखा असा :औरंगाबाद जिल्ह्यात ४४, जालन्यात १५, बीड २२, लातूर ६, उस्मानाबाद १, नांदेड ३१, परभणीतील २६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जालन्यात १४१ टक्के, बीड १३३ टक्के, लातूर १०२ टक्के, उस्मानाबाद १०१ टक्के, नांदेड ११८ टक्के, परभणी ११५ टक्के, हिंगोली १०७ टक्के पाऊस झाला आहे. यापुढे होणारा पाऊस हा खरीप पिकांचे नुकसान करणाराच असेल.

मोठ्या प्रकल्पांची स्थिती अशी :जायकवाडी ४७.९१ टक्के,निम्न दुधना ९६.७० टक्के,येलदरी १०० टक्के,सिध्देश्वर ९९.४२ टक्के,माजलगांव ९४.८७ टक्के,मांजरा ६३.१० टक्के,पैनगंगा ९२.८६ टक्के,मानार १०० टक्के,निम्न तेरणा ७०.१७ टक्के,विष्णुपुरीत १०० टक्के,सिना कोळेगांव ०.४६ टक्के

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरीDeathमृत्यू