शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

मराठवाड्यातील १४५ मंडळात पाणीच पाणी; आठ दिवसांत ३१ जणांचा बळी, ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:44 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली.

ठळक मुद्देविभागात सरासरीपेक्षा ११९ मि.मी. पाऊस जास्तसलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी३ लाख हेक्टरच्या आसपास पिकांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हाहाकार उडवून दिला. वार्षिक सरासरीपेक्षा ११९ मि.मी. पाऊस जास्त नोंदविला गेला आहे. ६७९ मि.मी.च्या तुलनेत ७९८ मि.मी. पाऊस विभागात आजवर झाला. ८ सप्टेंबर रोजी १४५ मंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली. ३ लाख हेक्टरच्या आसपास पिकांचे नुकसान झाल्याची नोंद विभागीय प्रशासनाने घेतली आहे.

आठ दिवसांत ३१ जणांचा बळी : ५ जणांचा शोधऔरंगाबाद ४, जालना ४, परभणी २, हिंगोली ४, नांदेड ७, बीड ५, लातूर ३, उस्मानाबाद २ अशा ३१ जणांचा बळी आठ दिवसांत पावसाने घेतला आहे. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसात वाहून गेलेल्या ५ जणांचा शोध सुरू आहे. २३ लहान-मोठी जनावरे पावसाने वाहून गेली. २३ ठिकाणी घरे पडली.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. ४४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सुमारे १ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामाच्या नुकसानाची प्राथमिक नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. अनेक ठिकाणी पाहणी, पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवसात ८० मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस म्हणून नोंदला गेला. ५८१ मि.मी.च्या तुलनेत ६९६ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. ११९ टक्के हे प्रमाण आहे. कन्नड तालुक्यातील २ लघुतलाव फुटले असून त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

जिल्हानिहाय पावसाचा तडाखा असा :औरंगाबाद जिल्ह्यात ४४, जालन्यात १५, बीड २२, लातूर ६, उस्मानाबाद १, नांदेड ३१, परभणीतील २६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जालन्यात १४१ टक्के, बीड १३३ टक्के, लातूर १०२ टक्के, उस्मानाबाद १०१ टक्के, नांदेड ११८ टक्के, परभणी ११५ टक्के, हिंगोली १०७ टक्के पाऊस झाला आहे. यापुढे होणारा पाऊस हा खरीप पिकांचे नुकसान करणाराच असेल.

मोठ्या प्रकल्पांची स्थिती अशी :जायकवाडी ४७.९१ टक्के,निम्न दुधना ९६.७० टक्के,येलदरी १०० टक्के,सिध्देश्वर ९९.४२ टक्के,माजलगांव ९४.८७ टक्के,मांजरा ६३.१० टक्के,पैनगंगा ९२.८६ टक्के,मानार १०० टक्के,निम्न तेरणा ७०.१७ टक्के,विष्णुपुरीत १०० टक्के,सिना कोळेगांव ०.४६ टक्के

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरीDeathमृत्यू