शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानधन मिळण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल आणि तितकेच पोलीस कर्मचारी ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल आणि तितकेच पोलीस कर्मचारी निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी राबले. यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. निवडणुकीसाठी काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेने राबराब राबून घेतले; परंतु लालफितीच्या कारभारामुळे मानधन मिळालेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ८६५ पैकी ६१७ ग्रामपंचायतींपैकी ५७९ ठिकाणी निवडणुका झाल्या. ३२ ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध, तर ६ ठिकाणी निवडणूक घेतली गेली नाही.

३ कोटींचा सरकारी चुराडा

जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत ग्रामविकास खात्याकडून येणाऱ्या सुमारे ३ कोटी २ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक व्यवस्थापन खर्चात कपात केली असली तरी निवडणूक नियोजनासाठी जेवढा खर्च लागणार आहे, तेवढा करावाच लागला. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुमारे ४९ हजार रुपये प्रशासकीय खर्च झाला. १० हजार रुपयांचा पहिला टप्पा प्रत्येक ग्रामपंचायतीत देण्यात आला होता.

जिल्ह्यातील किती ग्रामंपचांयतींची झाली निवडणूक - ६१७

किती केंद्रांवर झाली निवडणूक - २२६८

अधिकारी किती - १५०

कर्मचारी किती - १२ हजार

दीड कोटींच्या आसपास मानधन

ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन हे विधानसभा आणि लोकसभेच्या तुलनेत कमी असते. ते ठराविक स्वरूपात असले तरी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते अदा करण्यात येते. प्रशिक्षण, मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेसह इतर कामांत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. सर्व ग्रामपंचातींवर काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात दीड ते २ कोटींच्या आसपास मानधन वितरित होणे शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील निवडणुकीचाच खर्च मिळेना

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात २ कोटी रुपयांच्या आसपास खर्च झाला होता

त्यातील बहुतांश रक्कम मध्यंतरी मिळाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन उशिरा देण्यात आले होते. मागील निवडणुकीत सहा महिन्यांनंतर मानधन मिळाले होते. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक खर्च मोठा असल्यामुळे त्यासाठी तातडीने तरतूद होते. त्यात मानधन लवकर मिळण्याची प्रक्रिया वेगाने होते.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले

निवडणूक प्रक्रियेतील उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, अनुदान आले आहे. ते किती आले आहे, ते अद्याप कळलेले नाही. येत्या एक-दोन दिवसांत जे अनुदान आले ते वाटप करण्यात येईल. पूर्ण अनुदान आलेले नाही. मानधन कुणाला किती द्यायचे, ते तहसील पातळीवर ठरविण्यात येते.