शहरं
Join us  
Trending Stories
1
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
2
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
3
सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप
4
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
5
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
6
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...
7
Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली
8
मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 
9
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
10
Maratha Reservation : "थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या"; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती
11
मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
12
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
13
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 
14
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 
15
पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी फेटाळला, फाशीची शिक्षा कायम
16
इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य
17
उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही
18
अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं
19
'पहला नशा'मध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला अन् ते पाहून स्पॉट बॉय...; फराह खानने सांगितला किस्सा
20
बापरे! नखांवरून समजतो मोठ्या आजाराचा धोका; 'या' संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

पाणीटंचाईचे संकट गहिरे, वाघूर नदीचे पात्र टोकरून ग्रामस्थांकडून भागवली जातेय तहान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:10 PM

सोयगाव तालुक्यातील गावांमधील गंभीर स्थिती; सावरखेडा येथील ग्रामस्थ पाण्याच्या शोधार्थ गावाच्या बाजूला असलेल्या नदीत खड्डे करून पाणी घेत आहेत.

- यादवकुमार शिंदेसोयगाव : तालुक्यातील सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी या तीन गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थांवर वाघूर नदीपात्र टोकरून खड्डे करीत पाणी शोधून तहान भागविण्याची वेळ आली आहे.

सोयगाव तालुक्यातील अजिंठा लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या सावरखेडा (पांढरी), दत्त वाडी, लेनापूर या तीन गावांची एकच सावरखेडा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावांना ग्रामपंचायतीच्या गाव शिवारातील विहिरीतून जलकुंभाच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. दोन महिन्यांपुर्वी सदरील विहिर कोरडी पडल्याने ही नळ योजना बंद झाली. त्यामुळे या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावात पाणीच नसल्याने येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. 

येथील ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सोयगाव पंचायत समितीला १५ दिवसांपूर्वी पाठविला होता. पंचायत समितीने बुधवारी याबाबत पडताळणी केली असता ग्रामपंचायतीने ज्या विहिरीच्या अधिग्रहणाची शिफारस केली आहे, ती विहीरच कोरडी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर ताशेरे मारून प्रशासनाने हा प्रस्ताव परत ग्रा. पं.ला पाठविला आहे.

निवडणुकीमुळे प्रस्तावाकडे दुर्लक्षप्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने सावरखेडा ग्रामपंचायतीने १५ दिवसांपूर्वी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सोयगाव पंचायत समितीला पाठविला होता; परंतु अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या प्रस्तावाकडे कोणीही लक्ष दिले नाही. बुधवारी याबाबत ओरड वाढल्यानंतर प्रस्ताव पाहून पडताळणी केली. तेव्हा ग्रा. पं.नेही कोरडी असलेल्या विहिरीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठवल्याचे निदर्शनास आले.

दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यातसावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी येथील ग्रामस्थ गाव शिवारातील वाघूर नदीपात्रात खड्डे करून पाणी घेत आहेत. हे पाणी दुषित आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे असतानाही नाविलाजाने येथील ग्रामस्थ तहान भागविण्यासाठी हे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी ग्रुप ग्रा.पं.ची लोकसंख्या: १ हजार ५००

‘लोकमत’ची भूमिकानिवडणुकीच्या गदारोळात ग्रामीण भागातील पाणी प्रश्नाकडे नेते आणि प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचेच सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडीमधील पाणीटंचाईमधून लक्षात येते. ज्या विहिरीचा अधिग्रहण प्रस्ताव पाठवला ती विहीर कोरडी असल्याचे लक्षात आले. हा प्रशासकीय यंत्रणेतला कोडगेपणाच म्हणावा लागेल. पाण्यासाठी ओरड करून एकीकडे नागरिकांचा घसा कोरडा पडला असताना दुसरीकडे निवडणुकीच्या धामधुमीत लाखोंचे मद्य रिचवले गेल्याचेही जनतेने पाहिले. निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचे पाट वाहिले गेले. या प्रचंड अशा रकमेतूृन अनेक गावांची तहान भागवता आली असती. मात्र, पाण्यासाठी जनतेच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्याची दृष्टी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे नसल्याचेच यानिमित्ताने समोर आले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई