शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर शहरात व्हर्टिकल गार्डन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:20 IST

Vertical gardens in Aurangabad city दिल्लीच्या धरतीवर व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक यांनी पत्रकारांना सांगितले.

ठळक मुद्देशहरातील उड्डाणपुलांच्या भिंती, रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीचा वापर करून व्हर्टिकल गार्डन विकसित केले जाणार खासगी एजन्सीकडून महापालिका अशा पद्धतीचे व्हर्टिकल गार्डन विकसित करणार आहे.

औरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये शहराच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी महापालिकेने काही भागात व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने महापालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी दिला असून, त्यातून व्हर्टिकल गार्डन विकसित केले जाणार आहेत. यासोबतच विविध भागांत कारंजेही सुरू केले जाणार असल्याची माहिती प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

एमआयडीसी भागातील कंपन्यांमुळे जमिनीतील पाणी दोन दशकांपूर्वीच खराब झाले. वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले. शहरातही हवेतील धुळीचे कण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत महापालिकेने खुल्या जागांवर हजारो झाडे लावून ऑक्सिजन हब तयार केले आहेत. हर्सूल तलाव परिसरात जांभूळबन विकसित करण्यात आले आहे. त्यासोबत आता दिल्लीच्या धरतीवर व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक यांनी पत्रकारांना सांगितले. देशातील अनेक शहरांमध्ये व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहेत. औरंगाबादेत मात्र अद्याप एकही व्हर्टिकल गार्डन नाही. केंद्र शासनाने शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून व्हर्टिकल गार्डन विकसित केले जातील. सोबतच काही ठिकाणी पाण्याचे कारंजे सुरू केली जातील. जेणेकरून हवेतील धुळीचे कण कमी होतील.

उड्डाणपुलाच्या भिंतीचा उपयोगशहरातील उड्डाणपुलांच्या भिंती, रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीचा वापर करून व्हर्टिकल गार्डन विकसित केले जाणार आहेत. लवकरच यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

दहा कोटी रुपये ड्रेनेजसाठीमहापालिकेने भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेतले होते. पण ही योजना निधीच्या कमतरतेमुळे गुंडाळण्यात आली. प्रकल्पातील कोट्यवधींची कामे शिल्लक आहेत. त्यात काही भागातील ड्रेनेजलाईन मुख्य सिव्हरलाईनला जोडण्याच्या कामाचा समावेश आहे. हे काम झाले नसल्यामुळे खाम नदीत ड्रेनेजचे पाणी येऊन प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे १० कोटींचा निधी वापरून ड्रेनेजची अत्यावश्‍यक कामे केली जाणार आहेत.

व्हर्टिकल गार्डन म्हणजे काय?शहरी भागात उद्यान विकसित करण्यासाठी जागा खूप लागते. त्यामुळे कमी जागेत प्रदूषण रोखण्यासाठी व्हर्टिकल गार्डनचा पर्याय मागील काही वर्षांमध्ये रुढ झाला आहे. या आधुनिक पद्धतीमध्ये एखाद्या भिंतीला लागून एकावर एक झाडे लावण्यात येतात. या झाडांना ठिबक पद्धतीने कमी पाणी लागते. घराच्या आत किंवा बाहेरही अशा पद्धतीचे गार्डन विकसित केले जाते. खासगी एजन्सीकडून महापालिका अशा पद्धतीचे व्हर्टिकल गार्डन विकसित करणार आहे. त्यानंतर देखभाल, दुरुस्ती महापालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात येईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका