शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:49 IST

सर्व उद्योग गुजरातला पाठविणाऱ्या भाजपचे राजकारण महाराष्ट्र विरोधी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला

छत्रपती संभाजीनगर : संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला देशातील जनतेने २४० वर रोखले. महाराष्ट्रात त्यांनी संविधान चिरडले आहे, यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही संविधानासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई असेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रविवारी शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उशीर झाल्याने थेट आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, राज्यात आता कोणीही खुश नाही. शेतकरी नाराज आहे, तरुणांना रोजगार नाही. मात्र, काहींना ७२ व्या मजल्यावर फ्लॅट मिळाला, तर कोणाला टोल नाके मिळाले आहे. गद्दारांची दोन वर्षांत जशी प्रगती झाली तशी राज्याची प्रगती झाली नसल्याचे आदित्य यांनी नमूद केले.

भाजपचे राजकारण राज्यविरोधीभाजपचे राजकारण महाराष्ट्र विरोधी असल्याचा आरोप करीत आदित्य म्हणाले की, हे सर्व उद्योग त्यांनी गुजरातला पाठविले. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणाऱ्या मर्सिडिज बेंज कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने धाड मारली. कशासाठी मारली धाड, काय कारवाई केले याचे उत्तर द्यावे लागेल असेही ठाकरे म्हणाले.

चार जेसीबी आणि क्रेन लावून स्वागतआदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी एका क्रेनवर मोठा हार लावण्यात आला होता. तसेच चार जेसीबीमधून फुलांची उधळण त्यांच्यावर करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबादShiv Smarakशिवस्मारकvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपा