शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांची दिवाळी अनुदानाविना

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

औरंगाबाद : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,

औरंगाबाद : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य वेतन योजनेच्या सुमारे ९९ हजार लाभार्थ्यांना अनुदानाविना दिवाळी साजरी करावी लागली आहे. संवेदनाहीन महसूल प्रशासनामुळे लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा करण्यास उशीर झाला. दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याचे अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे. कोणत्या तालुक्यात किती अनुदान वाटप झाले, याची कुठलीही इत्थंभूत माहिती प्रशासनाकडे नसल्याचे सोमवारी समोर आली. अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना फैलावर घेऊन जिल्ह्यातील अनुदान वाटपाची तातडीने माहिती घेण्याचे आदेश दिले. नव्याने राबविण्यात आलेल्या दिलासा योजनेचा आढावा न घेतल्यामुळे त्या योजनेचेही वाटोळे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून या योजनांचा अजून आढावा घेण्यात आलेला नाही. बँकांना अनुदानाची रक्कम देऊन प्रशासन निवांत झाले आहे. ते अनुदान लाभार्थ्यांच्या हाती पडले की नाही, याची कुठलीही तसदी प्रशासनाने घेतली नाही. शासनातर्फे निराधारांना आधार मिळण्यासाठी वरील योजना सुरू करण्यात आल्या. ४०० ते ६०० रुपयांपर्यंत दरमहा अनुदान योजनेतून दिले जाते. अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होते. लाभार्थ्यांना अनुदान वेळेत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याने दिवाळीपूर्वी अनुदान वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. परंतु अधिकाऱ्यांनी व तत्सम यंत्रणेने या प्रकरणात काहीही लक्ष न घातल्यामुळे निराधारांना ऐन सणासुदीत अनुदानापासून वंचित राहावे लागले. संजय गांधी निराधार योजनेचे २४ हजार ५७८ लाभार्थी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबरचे अनुदान औरंगाबाद, फुलंब्री, वैजापूर तालुक्यात वाटप करण्यात आले आहे. उर्वरित तालुक्यात सप्टेंबर आणि आॅगस्टपर्यंतचे अनुदान देण्यात आले आहे. श्रावणबाळ योजनेत ४३ हजार ९०१ लाभार्थी आहेत. याबाबत बँकेकडून आणि प्रशासनाकडून लाभार्थ्यांना कु ठलीही माहिती दिली जात नाही. वृद्धापकाळ योजनेचे २९ हजार ९७२ लाभार्थी आहेत. विधवा अनुदान योजनेतून ५६८ लाभार्थ्यांना आॅक्टोबरपर्यंतचे अनुदान मिळाले आहे. अपंग आणि अर्थसाह्य योजनेतील लाभार्थ्यांची हीच अवस्था आहे. अधिकारी बदलले; योजनांकडे दुर्लक्षतत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी निराधारांसाठी असलेल्या योजनांच्या अनुदान वाटपात सुसूत्रता आणली होती. आॅनलाईन अनुदान देण्याचा प्रयोगही त्यांच्या काळात झाला होता. परंतु मे महिन्यापासून आजवर दोन जिल्हाधिकारी बदलून आले. त्यामुळे प्रशासनात मरगळ आलेली आहे. त्या परिणामातूनच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्न असलेल्या योजनांची गती मंदावली आहे. अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे म्हणाले, अनुदान तातडीने वाटप करण्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्यात येईल.