उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:22 IST2025-11-02T12:21:55+5:302025-11-02T12:22:14+5:30

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही.

Uddhav Thackeray's 4-day "Dagabaaz Re" tour in Marathwada, will interact with farmers | उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद

उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद

छत्रपती संभाजीनगर - सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. परिणामी दिवाळी सरून आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही. यापार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौरा करणार आहे. "दगाबाज रे" या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकर्‍यांशी संवाद साधतील, अशी माहिती उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी रविवारी (दि.२) येथे पत्रकार परिषदेत दिली.

माजी विरोधीपक्षनेते दानवे म्हणाले की, निवडणूक आयोगाविरोधात काल मुंबईत आयोजित मोर्चात राजकीय पक्षासोबत सामान्य जनताही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यातून जनतेचा रोष दिसून आला. या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला भाजपने प्रती आंदोलन केले मात्र ते झाकोळल्या गेले.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने ३१ हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली. दिवाळीपूर्वी ते पॅकेजचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार होते. मात्र सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयाही दिला नाही. शिवाय जमीन खरडून गेली, घरेदारे वाहून गेली त्याची मदत अद्याप मिळाली नाही.

गेल्या महिन्यात आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता.  तेव्हा ठाकरे यांनी पॅकेजचे काय झाले हे पहायला दिवाळीनंतर पुन्हा  येईल, असे सांगितले होते. त्यानुसार ठाकरे हे दि.५,६, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यांवर येणार आहेत.  या दौऱ्याची सुरवात बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होईल. या दौऱ्यात ते सुमारे ३४ तालुक्यातील विविध  गावांत  शेतकऱ्यांशी संवाद साधतील असे दानवे यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला उपनेते सुभाष पाटील, राजू वैद्य,सुकन्या भोसले आदी उपस्थित होते. 

हारतुरे, मंच नसेल

ठाकरे यांच्या मराठवाडाशेतकरी संवाद दौऱ्यात कोठेही हारतुरे नसेल. शिवाय कोठेही मंच उभारला जाणार नाही, ते वाड्यावर, चावडीवर शेतकऱ्यांशी संवाद साधतील,असे दानवे यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ,  सर्व खासदार, उपनेते, संपर्कप्रमुख यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी होतील, असे दानवे यांनी सांगितले.

Web Title : उद्धव ठाकरे का मराठवाड़ा दौरा: किसानों से करेंगे संवाद, वादे अधूरे.

Web Summary : उद्धव ठाकरे 5-8 नवंबर तक मराठवाड़ा का दौरा करेंगे, भारी बारिश के बाद मुआवजे के अधूरे वादों पर किसानों की शिकायतों का समाधान करेंगे। "दगाबाज रे" नामक दौरे का उद्देश्य किसानों के साथ सीधे उनके गांवों में जुड़ना है।

Web Title : Uddhav Thackeray's Marathwada Tour: To interact with farmers on unfulfilled promises.

Web Summary : Uddhav Thackeray will tour Marathwada from November 5-8 to address farmer grievances regarding unfulfilled compensation promises after heavy rains. The tour, named "Dagabaj Re," aims to connect with farmers directly in their villages, without formal stages or garlands.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.