शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने; भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी, उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 20:34 IST

आम्ही सत्तेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा शिंदे गटाचं काय चाटतंय?

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, देश हुकूमशाहीकडे जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणतात, आज संभाजीनगरमध्ये समाधानाने, आनंदाने आलोय. हेच ते शहर आणि हेच ते मैदान, 1988 साली महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात दिल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातले होते. तेव्हा त्यांनीच या शहराचे नाव संभाजीनगर केले. त्यानंतर आजपर्यंत काय-काय घडलं, ते तुम्हाला माहितीये. भारतीय जनता पक्षासोबत आपली युती होती. दोनवेळा आपले सरकार आले. पण, औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही तो निर्णय दिला.

मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर तुम्ही मेबबुबा मुफ्तींसोबत काय करत होता. आम्ही सत्तेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा शिंदे गटाचं काय चाटतंय? लालू-नितीश यांचं सरकार पाडून तुम्ही नितीश यांचं काय चाटलं? मेघालयातील सरकारवर आरोप केले आणि आता त्यांच्यासोबत सत्तेत बसलेत, अमित शहा तुम्ही आता संगमांचं काय चाटताय? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला. शिवरायांचे नाव घेता आणि पाठिमागून वार करता. पदव्या दाखवून तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आणि पीएम मोदींची पदवी मागितली म्हणून 25 हजारांचा दंड होतोय, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

निवडून दिलं म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकत नाही, जनतेला बेफाम सत्तेवर वचक ठेवावाच लागेल. सत्ताधारी सगळं काही त्यांच्या मित्रांसाठी करतायंत, शेतकऱ्यांना मात्र दहा रुपयांचा चेक देऊन चेष्ठा केली जातेय. दडपशाहीविरोधात इस्त्रायलमध्ये लोक रस्त्यावर उतरलेत, राष्ट्रपतींनी पंतप्रधांना झापलं, त्यानंतर त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. मला जमीन दाखवायला निघालात, तुम्ही महाराष्ट्राचे नाही आणि आम्हाला शिकवता? भाजपचा सोम्यागोम्या आमच्यावर आरोप करतो आणि आमचं कुणी काही बोललं तर खटले दाखल करता? मविआचं सरकार ज्या पद्धतीनं पाडण्यात आलं, ती पद्धत तुम्हाला मंजूर आहे का? महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेनं होतेय. हा भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा