शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

हर्सूल परिसरात पाण्याच्या डबक्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 6:20 PM

हर्सूल परिसरातील कोलठानवाडी रोडवरील एका शेतातील डबक्यात पोहताना दोन शाळकरी मुलांचा आज दुपारी मृत्यू झाला.

औरंगाबाद: नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्याशेजारील एका शेतातील डबक्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही  खळबळजनक घटना कोलठाणवाडी रस्त्यावर सोमवारी (दि. ९)दुपारी अडिच ते तीन वाजेच्या सुमारास घडली.  

सोहेल शफिक पठाण (११)आणि शेख युसूफ(१३,दोघे रा. यासीनकॉलनी, हर्सूल) अशी मृतांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना हर्सूल पोलिसांनी सांगितले की, सोहेल पठाण आणि  शेख युसूफ हे दोघेही शिक्षण घेतात. दुपारी अडिच वाजेच्या सुमारास शाळेतून घरी आल्यानंतर ते फिरायला जातो, असे सांगून घराबाहेर पडले. 

या रस्त्याव सुमारे आठ फुट खोल असलेल्या या खड्ड्यात नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी साचले होते. त्यांनी त्यांच्या अंगावरील कपडे काढून खड्ड्याच्या काठावर ठेवले आणि एका पाठोपाठ दोघेही पाण्यात उतरले. मात्र, पोहायलाच येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. ही बाब परिसरातील  नागरीकांच्या लक्षात येताच काहींनी पाण्यात उतरून बुडालेल्या सोहेल आणि युसूफ यांना   बाहेर काढले. त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी दोन्ही चिमुकल्यांना तपासून मृत घोषित केले.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थीgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीhersulहर्सूल