शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 6:33 PM

प्रेमप्रकरणातून मित्रांचे कारमधून अपहरण करून नेणाऱ्या दोन जणांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक करून अपहत तरूणाची मुक्तता केली.

औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून मित्रांचे कारमधून अपहरण करून नेणाऱ्या दोन जणांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक करून अपहत तरूणाची मुक्तता केली. हे अपहरण आज १ आॅक्टोबर रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा येथील गोपाल टी जवळ घडले. अमोल दिलीप अंभोरे (वय २६,रा. भगतसिंगनगर, मयुरपार्क) आणि सागर विष्णू खंडागळे (वय २४,रा. सातारा परिसर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. भावेश संजय सोनवणे (वय २२) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अक्षय परमानंद मेहता याने या अपहरणाची उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, भावेशला अमोल आणि विष्णू यांनी आज सकाळी क्रांती चौकात भेटण्यास बोलावले होते. यावर भावेश अक्षयला सोबत घेऊन क्रांती चौकात गेला. येथे अमोल आणि विष्णू आले असता त्यांनी भावेशाकडून त्याचा मोबाईल घेतला. अमोलने भावेश आणि त्याच्या माजी प्रेयसीची चॅटींग मोबाईलमध्ये पाहिली. ती सर्व चॅटींग डिलीट करत त्याने अक्षयला तिथेच थांबवत भावेशला कारमध्ये बसवून तेथून अज्ञातस्थळी नेले.

या प्रकारानंतर अक्षयने भावेशला फोन लावला असता तो बंद असल्याचे कळले. यामुळे अक्षयने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी झटपट कारवाई करून अपहरणकर्त्यांना निरालाबाजार येथे पकडले. आरोपींच्या ताब्यातून भावेशची मुक्तता करून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरणArrestअटक