दोन अल्पवयीन मुलींना पळविले

By Admin | Updated: December 4, 2014 00:53 IST2014-12-04T00:49:48+5:302014-12-04T00:53:08+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील घाटंग्री येथील दोन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two minor girls escaped | दोन अल्पवयीन मुलींना पळविले

दोन अल्पवयीन मुलींना पळविले


उस्मानाबाद : तालुक्यातील घाटंग्री येथील दोन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील घाटंग्री येथील दोन अल्पवयीन मुलींना संजय कदम रा. रत्नापूर. ता कळंब याने लग्नाचे आमिष दाखवून मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पळवून नेले. या प्रकरणी सदर मुलींच्या वडिलांनी उस्मानाबाद येथे ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संजय कदम याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारी हे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two minor girls escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.