शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

दोन जिल्ह्याच्या वादातून शेतकऱ्यांना भूसंपादनाचे धनादेश मिळण्यास लागली २१ वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 6:54 PM

शेतकऱ्यांना मोबदला कुणी द्यायचा, यावरुन जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या वादात २१ वर्षे उलटून गेले.

ठळक मुद्दे२१ वर्षांनंतर मिळाले धनादेश भाकरवाडीतील शेतकरी आनंदी 

लाडसावंगी (औरंगाबाद ) : परिसरात १९९८ मध्ये कऱ्हाडी नदीवर बाबूवाडी मध्यम प्रकल्प झाला होता. परंतु त्या धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नव्हता, तो लाडसावंगी येथे सोमवारी वाटप करण्यात आला. धनादेश मिळाल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत.

२००४ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. या धरणाची पाळू लाडसावंगी (ता. औरंगाबाद) क्षेत्रात आहे व पाणी साठवण जालना जिल्ह्यातील भाकरवाडी (ता. बदनापूर) येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर झाले. हे धरण औरंगाबाद जि.प.ने बांधले, पण यात जालना जिल्ह्यातील भाकरवाडीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. यामुळे शेतकऱ्यांना मोबदला कुणी द्यायचा, यावरुन जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या वादात २१ वर्षे उलटून गेले. यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी हा वाद मिटवून भाकरवाडी येथील शेतकऱ्यांना लाडसावंगी येथे धनादेश वाटप केले.

यावेळी औरंगाबाद जि.प.चे मुख्य कार्यकारी आधिकारी पवनीत कौर, सभापती राधाकिसन पठाडे, सरपंच सुदाम पवार, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घुगे, नामदेव तिडके, रामबाबा शेळके, नामदेव तिडके, जब्बार खान, स्मिता जैन, अनिल शेजूळ, शफिक बागवान व शेतकरी हजर होते.

टॅग्स :DamधरणMONEYपैसाFarmerशेतकरी