शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील

By बापू सोळुंके | Updated: November 5, 2023 19:00 IST

१ डिसेंबरपासून विदर्भ आणि कोकणात करणार संवाद दौरा

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. या कालावधीत सरकार आम्हाला आरक्षण देईल असा, विश्वास आहे. पण दगाफटका होऊ शकतो, हे गृहीत धरून आम्ही गाफील न राहता प्रत्येक गावांत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. नऊ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात एसईबीसी आरक्षण मिळावे, यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कार्यकक्षा राज्यव्यापी केली, राज्यसरकारच्या या भूमिकेकडे तुम्ही कसे पाहता, या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे, आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय हवा आहे, म्हणूनच आम्ही ५० टक्केच्या आत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आमची मागणी आहे.

राज्य सरकारनेही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्याकडे वेळ मागितला. आम्हीही दोन महिन्यांचा वेळ दिला. सरकारवर विश्वास आहे का, असे विचारले असता, हो, सरकार आम्हाला आरक्षण देईल, असा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही त्यांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे. असे असले तरी दगाफटका होण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही गाफील राहणार नाही. राज्यातील प्रत्येक गावांत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचे रूपांतर साखळी उपोषणात करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय जेथे आंदोलन नाही, त्या गावांतही साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

१ डिसेंबरपासून मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात संवाद दौरा

जरांगे यांच्या पहिल्या टप्प्यातील संवाद दौऱ्याला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी लाखोंच्या सभा झाल्या. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली असल्याने १ डिसेंबरपासून ते आता संवाद दौरा करणार आहेत. जरांगे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद