शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील पर्यटन स्थळे सुरक्षित असावीत!

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत,

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत, वाहनातून उतरताच जपानी भाषा बोलत विविध सामान खरेदी करण्याचा आग्रह धरणारे व्यापारी, रेल्वेस्टेशनवर उतरताच भिकाऱ्यांचा गराडा पाहून आश्चर्य वाटते. ही परिस्थिती बदलायला हवी. जगप्रसिद्ध अजिंठा- वेरूळ आमच्या देशात असते तर आम्ही खूप उत्साहाने त्याची जपणूक केली असती, असे मत जपानी नागरिकांच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. भारत- जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत २५ आॅगस्ट २०१२ मध्ये शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर औरंगाबाद सिटी मेगा क्लिनिंग ईव्हेंट आॅर्गनायझिंग कमिटीचे चैतन्य भंडारे आणि गिरीश मगरे यांच्या पुढाकाराने २५ आॅगस्ट रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जपानहून खास सात स्वच्छता दूत शहरात दाखल झाले आहेत. उद्या आणखी दोन जण येणार आहेत. यामध्ये तोषिओ चिगुसा, सासाकी जिनसुके, एबीस्यू ताकाफुमी, आकितो साकाई, नाकामोतो युकारी, सावादा इत्सुकी, सुरुगा मेगुमी यांचा समावेश आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते पुढे म्हणाले की, जपानमध्ये आम्ही वेगवेगळ्या संघटनांसोबत स्वच्छतेचे काम करीत आहोत. सुरुवातीला आमच्याकडेही अशीच अवस्था होती; पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. औरंगाबादही स्वच्छ, सुंदर होईल. 1औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाहायला आम्हाला आवडेल, बाजारपेठेत खरेदी-विक्रीचा व्यवहार कसा होतो, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.2शिष्टमंडळातील काही सदस्यांनी या शहरात एक ते दोन वर्षे राहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कारण येथे कामाला खूप वाव आहे.3टपाल पेट्या स्वच्छ करण्याचा एका सदस्याला खूप छंद आहे. तो एका वाहनावर बसून शहरातील विविध टपालपेट्या साफ करणार आहे.4हीच पर्यटन स्थळे आमच्या देशात असती, तर कुठेच केरकचरा आढळला नसता. यापेक्षा आणखी कितीतरी जास्त सोयी- सुविधा दिसल्या असत्या.