शहरं
Join us  
Trending Stories
1
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
2
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
5
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
6
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
7
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
10
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
11
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
12
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
13
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
14
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
15
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
16
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
17
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
18
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
19
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
20
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट

‘पुढचा मुख्यमंत्री मीच हे सांगायला फडणवीसांकडे वेळ आहे, पण राज्यासमोरचे कुठलेच प्रश्न सोडवायला वेळ नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 11:48 PM

‘पुढचा मुख्यमंत्री मीच असे स्वप्नरंजन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ आहे; पण महाराष्ट्रापुढचे कुठलेच प्रश्न सोडवायला वेळ नाही’ अशी घणाघाती टीका येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘संविधान बचाव....देश बचाव’ मेळाव्यात केली.

ठळक मुद्देअजित पवार यांचा घणाघात ‘संविधान बचाव....देश बचाव’ मेळावा उत्साहात प्रारंभी नृत्य, नाटिका व माहितीपट शेवटी मनुस्मृती व ईव्हीएम मशीनचे दहन

औरंगाबाद : ‘पुढचा मुख्यमंत्री मीच असे स्वप्नरंजन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ आहे; पण महाराष्ट्रापुढचे कुठलेच प्रश्न सोडवायला वेळ नाही’ अशी घणाघाती टीका येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘संविधान बचाव....देश बचाव’ मेळाव्यात केली. याच मेळाव्यात मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सरकारने द्यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनीही ही मागणी मेळाव्यात उचलून धरली.जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात विभागीय पातळीवरील या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

शरद पवार यांची अनुपस्थितीराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार होता; परंतु ऐनवेळी ते येऊ शकले नाहीत. एका महत्त्वाच्या बैठकीमुळे पवारसाहेब या मेळाव्याला येऊ शकले नाहीत, एवढाच खुलासा अजित पवार यांनी भाषणातून केला.

ही लोकसभेची तयारी का? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सुप्रिया सुळे यांच्या आधी बोलले. नेहमीप्रमाणे त्यांचे भाषण चांगलेच झाले. शेवटी त्यांनी एका हिंदी कवितेचा आधार घेत आपले भाषण रंगवले. याचा आधार घेत सुळे यांनी मिश्कील टिपणी केली, ‘धनंजय मुंडे यांचे भाषण चांगलेच झाले. आज ते हिंदी फार छान बोलताना दिसले. लोकसभेची तयारी करीत आहेत की काय, असे वाटून गेले.’ सुप्रिया सुळे यांनी हसत-हसत केलेल्या या टिपणीवर स्वत: धनंजय मुंडेही गालातल्या गालात हसत राहिले; पण जाहीररीत्या केलेल्या या टिपणीचा राजकीय अर्थ न काढला गेल्यास नवल. बीड लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभेची निवडणूक मुंडे भावा-बहिणीत रंगू शकते, अशी चर्चा लगेच सुरू झाली.

नृत्य, नाटिका, माहितीपट....दुपारी १२ वा. मेळाव्याचा एक भाग म्हणून नृत्य, नाटिका व माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. या सगळ्यांचा केंद्रबिंदू ‘संविधान’ हा होता. स्वत: डॉ. फौजिया खान यांनी याचे लेखन केलेले. विद्यमान सरकार संविधानाचे कसे धिंडवडे काढत आहे, याचा घटनाक्रमच या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्पष्ट करण्यात आला. अगदी लोकशाहीचा चौथा स्तंभही कसा दबावाकडे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावरच ‘संविधान बचाव’ अशी अक्षरे लिहिलेली काळी पट्टी आलेल्या प्रत्येक महिलेला देण्यात येत होती. महिलांनी ही पट्टी आपल्या डोक्याला बांधली होती. अधून-मधून ‘संविधान बचाव....देश बचाव’ या घोषणेने नाट्यगृह दुमदुमून जात होते. संविधान के सम्मान में.... राष्ट्रवादी काँग्रेस मैदान में, नकोरे बाबा मोदी सरकार, अशा घोषणाही निनादत होत्या.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौजिया खान यांनी प्रास्ताविक केले. आगामी काळात ‘नको रे बाबा मोदी सरकार’ हे आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केले. ११ आॅक्टोबर रोजी लोडशेडिंगविरोधात जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आपापल्या जिल्ह्यात आंदोलन करण्याचा आदेशही त्यांनी दिला. व पेट्रोलपंपांवरील मोदी यांच्या फोटोखाली काळी पट्टी लावून गॅस सिलिंडरच्या वाढत्या भावाबद्दलचा राग व्यक्त करा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले.

प्रारंभी, राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर औरंगाबाद शहर राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मेहराज पटेल यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले, तर सक्षना सलगर यांनी संविधान बचावची प्रतिज्ञा म्हटली. दिल्ली येथील कार्यक्रमात शरद पवार यांनी डॉ. फौजिया खान यांना दिलेली मशाल आज अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या हस्ते महिला पदाधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आली. नंतर सुरेखा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

घाईघाईत ठराव मंजूरया मेळाव्यात महागाई, सातबा-यावर अहिल्यादेवींचा फोटो, महिलांची असुरक्षितता, रोजच वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटना, शेतीमालाला हमीभाव, आदी ठराव घाईघाईतच मंजूर करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा छाया जंगले पाटील, सुरेखा लहाने, भाग्यश्री क्षीरसागर, रेखा कदम, वीणा खरे, भावना नखाते आदींनी हे ठराव मांडले. या मेळाव्यात सत्कारालाही फाटा देण्यात आला होता.माजी मंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, जयप्रकाश दांडेगावकर, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. प्रकाश गजभिये, गणेशराव दुधगावकर, माजी आ. प्रा. किशोर पाटील, संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे, सुधाकर सोनवणे, काशीनाथ कोकाटे, रंगनाथ काळे, कदीर मौलाना, शहाजहा फेरोज आदींची मंचावर उपस्थिती होती.

सरकार उलथून टाकाप्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडला. यासंदर्भातील पुरुषी विकृतीला सरकारच पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला, तर मायबाप जनताच संविधान वाचवू शकेल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. राम कदम यांच्या अलीकडील वक्तव्याचा सुळे आणि अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘तू समजतोस काय? सत्तेची माज आली का? नशा चढली का? धुंदी आली का? अशा शब्दांत पवार यांनी खडसावले. मुख्यमंत्र्यांना किती शेतकºयांच्या आत्महत्या पाहिजे म्हणजे ते मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करतील, असा जळजळीत सवालही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला कळत नाही, दिसत नाही, ऐकायला येत नाही. आता केंद्रातले व राज्यातले सरकार उलथून टाकल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे