शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात जलशुद्धीकरण यंत्राचे ६९ प्रस्ताव झाले दाखल

By admin | Updated: June 24, 2014 00:41 IST

प्रा. गंगाधर तोगरे, कंधार अशुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक रोगाचा सामना करावा लागतो़ त्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यासाठी

प्रा. गंगाधर तोगरे, कंधारअशुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक रोगाचा सामना करावा लागतो़ त्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यासाठी गटविकास अधिकारी ए़ एस़ कदम यांनी मागील महिन्यात संकल्प सोडला़ त्याला ग्रा़ पं़ नी सकारात्मक प्रतिसाद देत ६९ प्रस्ताव सादर झाले आहेत़ त्यातून रोगराई हद्दपार होवून गावाचे आरोग्य बळकट होण्यास वाव मिळणार आहे़तालुक्यात ग्रामपंचायतीची संख्या ११६ आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे मोठे दिवास्वप्न ठरते़ तहान भागविण्यासाठी विहीर, विंधन विहिरीच्या पाण्याचा सर्रासपणे वापर करावा लागतो़ पाण्याचा अशुद्ध व दूषितपणा आरोग्य निरोगीपणाला मोठा अडथळा ठरतो़ दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड, घसादुखी, त्वचाविकार, विषाणुजन्य आजाराचा धोका असतो़ जमिनीतील खोलवरचे पाणी पिण्यासाठी वापरल्यास फ्लोरोसीस आजार होण्याची शक्यता असते़ कारण त्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक असते़ जास्त काळ असे पाणी सेवन केल्यास सुरुवातीला दात वाढ व आकारावर त्याचा परिणाम होतो़ हाडात हळूवारपणे फ्लोराईड जमा होवून नानाविध आरोग्य समस्येचा सामना करावा लागतो़ त्यासाठी गटविकास अधिकारी यांनी निरोगी आरोग्याचा संकल्प सोडला़शासनाच्या विविध योजनेतून विविध विकासासाठी मोठा निधी येतो़ त्यातून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते़ त्यामुळे आलेगाव गावात ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचा प्रस्ताव दाखल झाला आहे़ आंबुलगा-३ लाख, औराळ-३ लाख, बाभूळगाव -३ लाख, बाचोटी- ३ लाख, भूकमारी- ३ लाख, भुत्याचीवाडी - ३ लाख, बिजेवाडी- ३ लाख, बोळका - ३ लाख, बोरी (खु़)-३ लाख, चिंचोली (पक़़)-३ लाख, चौकी धर्मापुरी-३ लाख, दाताळा, धानोरा कौठा, दिग्रस बु़, गांधीनगर, गंगनबीड, गऊळ, घोडज, घागरदरा, घुबडवाडी, गोगदरी, गोणार, गुंटूर, हाडोळी (ब्ऱ), हाळदा, हटक्याळ, हिप्परगा (शहा), इमामवाडी, जाकापूर, जंगमवाडी, कल्हाळी, कौठा, खंडगाव (ह़), कोटबाजार, लाडका, लालवाडी, महालिंगी, मजरे धर्मापुरी, मंगलसांगवी, मरशिवणी, मसलगा, मुंडेवाडी, नागलगाव, नंदनशिवणी, नंदनवन, नारनाळी, पानभोसी, पांगरा, रूई, पानशेवडी, पाताळगंगा, पेठवडज, पोखर्णी, रहाटी, राऊतखेडा, संगुचीवाडी, सावरगाव (नि़), शिराढोण, शिरसी बु़, शिरसी खु़, शिरूर, तेलूर, उमरगा (खो), उमरज, वहाद, वाखरड, वरवंंट व येलूर या सर्व ग्रामपंचायतीचे अंदाजित ३ लाख रुपये किंमतीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़२०१४-१५ च्या बीआरजीएफ जिल्हा वार्षिक नियोजनातून जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार आहेत़ हा मिळणारा निधी काही गावात कमी मिळणार आहे़ तरी अन्य निधीतून कसा मिळवला जातो आणि जलशुद्धीकरणाचा मार्ग मोकळा कसा होतो हे काही दिवसात कळणार आहे़ काटकळंबा गावात बसवलेले यंत्र नागरिकांचा उत्साह वाढविणारे ठरत आहे़ त्यामुळे ६९ गावांत आरोग्यवाढीस चालना मिळेल़