शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

उगवलेली मधुमका निघाली वांझोटी; बोगस बियाण्यांमुळे खर्चही गेला, पिकही गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 20:14 IST

बोगस बियाण्यांमुळे शिवराई, भोकनगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हतनूर : कन्नड तालुक्यातील शिवराई, भोकनगावच्या शेतकऱ्यांनी विविध कृषी दुकानांतून विकत घेतलेले मधुमकाचे बियाणे बोगस निघाले आहे. सदरील मका तर उगवून आली, मात्र, त्या ताटांना कणसेच आली नसून ती वांझोटी निघाली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून खरिपाचे उत्पन्न वाया गेले आहे.

तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मे ते जून महिन्यात मधुमकाची लागवड करतात. शिवराई व भोकनगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी परिसरातील विविध कृषी सेवा केंद्रांमधून नांगो सिड्स कंपनीचे मधुमकाचे बियाणे अडीच हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदी करून लागवड केली. सदरील बियाणे चांगले उगवले मात्र ते वांझोटे निघाले आहे. त्यातील अनेक ताटांना कणसेच लागली नाहीत, ज्या ताटांना कणसे लागली, त्यात दाणेच भरले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत, बियाणे खर्च, कीटकनाशक फवारणी, रासायनिक खते, असा सर्वच लागवड खर्च तर वाया गेलाच आहे. त्यात खरीप हंगामही वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नुकसानभरपाई देण्याची मागणी कल्याण नागरे, रावसाहेब मुठ्ठे, रामदास नागरे, काकासाहेब शिंदे, युवराज गिरी(सर्व रा. शिवराई), राजू खरे, राहुल नलावडे, किशोर नलावडे (सर्व रा. भोकनगाव) यांसह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी सोमवारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा केला. अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयात दाद मागू शकतातशिवराई व भोकनगाव येथील शेतकऱ्यांच्या मकाविषयी तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या शेतात पाहणी केली. खरोखरंच मकाच्या झाडाला जी कणसे आली ती वांझोटी निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही पंचनामा केला असून पाच दिवसांत अहवाल सादर केला जाईल.चार ते पाच दिवसांत अहवाल सादर केला जाईल. कंपनीने शेतकऱ्यांना जर नुकसानभरपाई दिली नाही, तर शेतकरी ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतात, असा कायदा आहे.-बाळराजे मुळीक, तालुका कृषी अधिकारी, कन्नड

नुकसानभरपाई द्यावी बियाणे कंपनीच्या विश्वासावर आम्ही बियाणे खरेदी करून ते जमिनीत पेरतो. शंभर टक्के खर्च करून जर उत्पन्न हातात येत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे. आमचा झालेला खर्च व हंगाम वाया गेला असून आज मधुमकाला चांगला दर असताना उत्पन्न मिळाले नाही. नांगो कंपनीने आमचे नुकसानभरपाई करून द्यावी ही आमची मागणी आहे.-रावसाहेब मुठ्ठे, शेतकरी, शिवराई

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र