शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

उगवलेली मधुमका निघाली वांझोटी; बोगस बियाण्यांमुळे खर्चही गेला, पिकही गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 20:14 IST

बोगस बियाण्यांमुळे शिवराई, भोकनगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हतनूर : कन्नड तालुक्यातील शिवराई, भोकनगावच्या शेतकऱ्यांनी विविध कृषी दुकानांतून विकत घेतलेले मधुमकाचे बियाणे बोगस निघाले आहे. सदरील मका तर उगवून आली, मात्र, त्या ताटांना कणसेच आली नसून ती वांझोटी निघाली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून खरिपाचे उत्पन्न वाया गेले आहे.

तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मे ते जून महिन्यात मधुमकाची लागवड करतात. शिवराई व भोकनगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी परिसरातील विविध कृषी सेवा केंद्रांमधून नांगो सिड्स कंपनीचे मधुमकाचे बियाणे अडीच हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदी करून लागवड केली. सदरील बियाणे चांगले उगवले मात्र ते वांझोटे निघाले आहे. त्यातील अनेक ताटांना कणसेच लागली नाहीत, ज्या ताटांना कणसे लागली, त्यात दाणेच भरले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत, बियाणे खर्च, कीटकनाशक फवारणी, रासायनिक खते, असा सर्वच लागवड खर्च तर वाया गेलाच आहे. त्यात खरीप हंगामही वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नुकसानभरपाई देण्याची मागणी कल्याण नागरे, रावसाहेब मुठ्ठे, रामदास नागरे, काकासाहेब शिंदे, युवराज गिरी(सर्व रा. शिवराई), राजू खरे, राहुल नलावडे, किशोर नलावडे (सर्व रा. भोकनगाव) यांसह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी सोमवारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा केला. अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयात दाद मागू शकतातशिवराई व भोकनगाव येथील शेतकऱ्यांच्या मकाविषयी तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या शेतात पाहणी केली. खरोखरंच मकाच्या झाडाला जी कणसे आली ती वांझोटी निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही पंचनामा केला असून पाच दिवसांत अहवाल सादर केला जाईल.चार ते पाच दिवसांत अहवाल सादर केला जाईल. कंपनीने शेतकऱ्यांना जर नुकसानभरपाई दिली नाही, तर शेतकरी ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतात, असा कायदा आहे.-बाळराजे मुळीक, तालुका कृषी अधिकारी, कन्नड

नुकसानभरपाई द्यावी बियाणे कंपनीच्या विश्वासावर आम्ही बियाणे खरेदी करून ते जमिनीत पेरतो. शंभर टक्के खर्च करून जर उत्पन्न हातात येत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे. आमचा झालेला खर्च व हंगाम वाया गेला असून आज मधुमकाला चांगला दर असताना उत्पन्न मिळाले नाही. नांगो कंपनीने आमचे नुकसानभरपाई करून द्यावी ही आमची मागणी आहे.-रावसाहेब मुठ्ठे, शेतकरी, शिवराई

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र