शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उगवलेली मधुमका निघाली वांझोटी; बोगस बियाण्यांमुळे खर्चही गेला, पिकही गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 20:14 IST

बोगस बियाण्यांमुळे शिवराई, भोकनगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हतनूर : कन्नड तालुक्यातील शिवराई, भोकनगावच्या शेतकऱ्यांनी विविध कृषी दुकानांतून विकत घेतलेले मधुमकाचे बियाणे बोगस निघाले आहे. सदरील मका तर उगवून आली, मात्र, त्या ताटांना कणसेच आली नसून ती वांझोटी निघाली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून खरिपाचे उत्पन्न वाया गेले आहे.

तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मे ते जून महिन्यात मधुमकाची लागवड करतात. शिवराई व भोकनगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी परिसरातील विविध कृषी सेवा केंद्रांमधून नांगो सिड्स कंपनीचे मधुमकाचे बियाणे अडीच हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदी करून लागवड केली. सदरील बियाणे चांगले उगवले मात्र ते वांझोटे निघाले आहे. त्यातील अनेक ताटांना कणसेच लागली नाहीत, ज्या ताटांना कणसे लागली, त्यात दाणेच भरले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत, बियाणे खर्च, कीटकनाशक फवारणी, रासायनिक खते, असा सर्वच लागवड खर्च तर वाया गेलाच आहे. त्यात खरीप हंगामही वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नुकसानभरपाई देण्याची मागणी कल्याण नागरे, रावसाहेब मुठ्ठे, रामदास नागरे, काकासाहेब शिंदे, युवराज गिरी(सर्व रा. शिवराई), राजू खरे, राहुल नलावडे, किशोर नलावडे (सर्व रा. भोकनगाव) यांसह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी सोमवारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा केला. अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयात दाद मागू शकतातशिवराई व भोकनगाव येथील शेतकऱ्यांच्या मकाविषयी तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या शेतात पाहणी केली. खरोखरंच मकाच्या झाडाला जी कणसे आली ती वांझोटी निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही पंचनामा केला असून पाच दिवसांत अहवाल सादर केला जाईल.चार ते पाच दिवसांत अहवाल सादर केला जाईल. कंपनीने शेतकऱ्यांना जर नुकसानभरपाई दिली नाही, तर शेतकरी ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतात, असा कायदा आहे.-बाळराजे मुळीक, तालुका कृषी अधिकारी, कन्नड

नुकसानभरपाई द्यावी बियाणे कंपनीच्या विश्वासावर आम्ही बियाणे खरेदी करून ते जमिनीत पेरतो. शंभर टक्के खर्च करून जर उत्पन्न हातात येत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे. आमचा झालेला खर्च व हंगाम वाया गेला असून आज मधुमकाला चांगला दर असताना उत्पन्न मिळाले नाही. नांगो कंपनीने आमचे नुकसानभरपाई करून द्यावी ही आमची मागणी आहे.-रावसाहेब मुठ्ठे, शेतकरी, शिवराई

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र