शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा

By बापू सोळुंके | Updated: May 14, 2024 18:18 IST

मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सगे-सोयऱ्याचा कायदा द्यावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावे, यासह अन्य मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच आमच्या आंदोलनाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिसेल असेही जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. 

छत्रपती संभाजीनगर येथे बुलंद छावा संघटनेच्यावतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी छत्रपती संभाजी राजेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले, मात्र हे आरक्षण लागू झाले नाही. सगेसोयऱ्याचा कायदा केला नाही, आंदोलकांवरील गुन्हे परत घेतले नाही, यामुळे ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरवात करणार आहे. 

तुमच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर समाजाला काय आवाहन करणार या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्व गोरगरीब मराठा समाज माझ्या पाठिशी आहे, मराठा समाजानेही शांततेत आंदोलन करायचे आहे. ८ जून रोजी नारायणगड(जि.बीड) येथे ६ कोटी मराठ्यांची जाहिर सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे ५० हजार स्वयंसेवक असतील. या सभेची काय तयारी सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपण नारायणगड येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या आतपर्यंत झालेल्या तीन टप्प्यात मराठा आंदोलनाचा काय परिणाम जाणवला, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमचा महायुती अथवा महाविकास आघाडीला किंवा अपक्षाला पाठिंबा नव्हता. केवळ मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे सांगितले होते. मी राजकारणी नसल्याने निवडणुकीत काय परिणाम झाला हे मला सांगता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. एकमात्र झाले की, पंतप्रधान मोदी साहेब महाराष्ट्रात येत नव्हते. ते गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट्रात सभा घेत आहे. हा मराठ्यांचा 'डर' असल्याचा दावा त्यांनी केला.

देवेंंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावाआम्ही मराठ्यांच्या विरोधात नव्हतो. पण फडणवीस यांनी आरक्षणाला विरोध केला, महिलांवर लाठीहल्ला केला, गोरगरीब मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदविले, महिलांनाही तडीपार केले. यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील