शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुस्तके चक्क विद्यार्थ्यांशी बोलू लागली; ग्रंथानंतर शालेय पुस्तकांनाही फुटला ‘कंठ’

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 6, 2023 12:47 IST

अ, आ, इ, ई असो वा ए, बी, सी, डी असो की बडबडगीत असो; बालकांना पुस्तकातून ऐकण्यास मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘पुस्तकाचे आत्मवृत्त’, ‘पुस्तकाचे मनोगत’, ‘पुस्तकाची आत्मकथा’... आता हे विषय निबंधापुरते मर्यादित राहिले नाहीत... किंवा ‘पुस्तक बोलू लागले तर..’ हीसुद्धा ‘परिकल्पना’ राहिली नाही. अहो, प्रत्यक्षात पुस्तके बोलू लागली आहेत. पुस्तकांनाही ‘कंठ’ फुटला आहे. हा काही चमत्कार नव्हेतर, आधुनिक तंत्रज्ञानाची किमया आहे.

होय, बाजारात दिल्लीतील खाजगी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेली शालेय पुस्तके विक्रीसाठी आली आहेत. सध्या शिशू वर्ग तसेच बालवाडी, इयत्ता पहिलीचे पुस्तक चिमुकल्यांशी बोलू लागले आहे. अ, आ, इ, ई असो वा ए, बी, सी, डी असो की बडबडगीत असो; बालकांना पुस्तकातून ऐकण्यास मिळत आहे. या पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात महाराष्ट्रातील खाजगी प्रकाशकही ‘बोलणारी डिजिटल पुस्तके’ प्रकाशित करतील.

बोलण्याचा पहिला मान पुराण ग्रंथांनामर्यादा पुरुषोत्तम ‘श्रीरामाची कथा’ रामायण व भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर जो उपदेश दिला ती ‘श्रीमद् भगवतगीता’ हे दोन आध्यात्मिक महान ग्रंथ आहेत. आध्यात्मिकतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन देशातील पहिल्या डिजिटल होणाऱ्या ग्रंथांचा मान या दोन ग्रंथांना मिळाला. हे दोन्ही ग्रंथ ‘विस्डम’ फ्लूट डिव्हाइसच्या साह्याने बोलत आहेत.

पुस्तक कसे बोलते?१) डिजिटल पुस्तकाच्या छपाईसाठी ‘मॅग्नॅटिक इंक’चा वापर करण्यात आला आहे.२) पुस्तकाच्या प्रत्येक पानाला ‘सेंसर’ आहे.३) पुस्तकासोबत ‘बुक रीडर डिव्हाइस’ देण्यात आले आहे.४) पेनासारखे असलेल्या या ‘डिव्हाइस’ला स्पीकर लावण्यात आला आहे.५) पुस्तकाच्या पानावर ज्या अक्षरावर तो ‘पेन’ (डिव्हाइस) ठेवला की तेव्हा ते अक्षर, तो शब्द, कविता स्पीकरमधून ऐकण्यास मिळते. अशा प्रकारे पुस्तक विद्यार्थ्यांशी बोलू लागते.६) या ‘डिव्हाइस’मध्ये आवाज कमी-जास्त करणे, रेकॉर्डिंगची सुविधा आहे.७) या डिव्हाइसला रिचार्जेबल बॅटरी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण